पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार, क्रेन पडल्याने शेतीपिकांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ – डॉ.गणेश ढवळे

8a46b74c da84 4579 98ef 3abd4e5c2ace

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बालाघाटावर आणि पाटोदा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी कंपन्यांचा सुळसुळाट असुन शेतकऱ्यांची फसवणूक करत मनमानी कारभार सुरू असुन शासकीय पाणंद रस्त्यावर अतिक्रमण असो अथवा वाहनांसाठी रस्ता करताना संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उभ्या पिकातुन नुकसान करत वहिवाट असो याविषयी कोणालाही न विचारता अरेरावी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा गुरुबा दाभाडे व नितिन दशरथ दाभाडे यांच्या शेतपिकांचे पवनचक्की उभारतानाचे क्रेन पडल्याने पिकांचे व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन पिकांचे तसेच झाडांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ:- भैरूबा दाभाडे

ff3b0eec 5ce3 46aa 91ab c2779f5f5010
लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा दाभाडे व नितिन दाभाडे यांच्या शेताशेजारी पवनचक्की उभारत असताना मध्यरात्री क्रेन पडल्याने झाडांचे व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.मध्यरात्री क्रेन पडल्याने अनर्थ टळला नाहीतर एरवी दिवसा त्याच झाडाखाली माणसं आणि जनावरे बांधलेली असतात.मध्यरात्री क्रेन पडल्याने जिवित हानी झाली नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे गत झाली आहे.रात्रभर जागून पिकाला पाणी दिले परंतु क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पवन प्रकल्प कंपन्यांची दादागिरी सुरू असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे:- डॉ.गणेश ढवळे
89cbc520 0cd8 4a16 a00b deb4c1fca171

बीड आणि पाटोदा तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार-या रेणु पावर कंपनी आणि सहयोगी वेदांश इन्फ्रा कंपनी यांनी स्थानिक दलालांच्या मदतीने शेतकऱ्यांची फसवणूक करुन जमिनी कवडीमोल भावाने लुबाडलेल्याच आहेत.परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील शिवरस्ते, पाणंद रस्ते यावर सुद्धा अतिक्रमण केले आहे.पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील शेतकरी जयवंत शिंदे यांना पवन ऊर्जा कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला होता.रस्ता खुला करण्यात यावा यासाठी १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणानंतर रस्ता खुला करून देण्यात आला. अशिक्षित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या कंपन्या करत असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

लिंबागणेश येथे दिवसाच कमलबाई खिल्लारे यांच्या घरी चोरी

234e791c ed52 4409 9ae7 65555713c96c

आठवडा विशेष (प्रतिनिधी):

आज दि.३० जुलै रविवार रोजी सकाळी रानात कामासाठी गेलेल्या श्रीमती कमलबाई भगवान खिल्लारे वय ६० वर्षे आपल्या नातीसह पल्लवी वय १४ वर्षे दररोज प्रमाणे स्वतः:च्या शेतात कामासाठी गेले होते.सायंकाळी ५ वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. भाचा दिनेश वायभट यांना कळवले असता त्यांनी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. राऊत संतोष यांना फोनवरून चोरीच्या घटनेची कल्पना दिली असता.पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील व पो.हे.संतोष राऊत घटनास्थळी दाखल झाले. श्रीमती कमलबाई खिल्लारे यांच्या म्हणण्यानुसार काही रोख रक्कम व सोनं चोरीला गेल्याचे सांगितले.पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.

महिनाभरापासुन डोळ्याच्या आपरेशन मुळे घरीच असणा-या कमलबाई आजच शेतात कामासाठी गेल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधकासाठी रास्ता रोको

IMG 20230504 WA0028

बीड:अहमदनगर -अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता मोरगाव फाटा,मुळुकवाडी,लिंबा गणेश बसस्थानक, भालचंद्र माध्यमिक विद्यालय,महाजनवाडी फाटा,वैद्यकिन्ही,सौंदाना, सोनेगाव फाटा व ग्रामीण रूग्णालय पाटोदा याठीकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.४ मे गुरुवार रोजी सकाळी १०वा लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निवेदन पोलिस उपनिरीक्षक नेकनुर पोलिस स्टेशन पानपाटील, पोह.डिडुळ, खांडेकर,खटाने, क्षीरसागर, ढाकणे,मंडळ अधिकारी वंजारी, तलाठी पोतदार, कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक राजेभाऊ आप्पा गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, लेहनाजी गायकवाड सुरेश निर्मळ , विक्रांत वाणी, अशोक वाणी,दादा गायकवाड, हरिओम क्षीरसागर जितेंद्र निर्मळ, तुळशीराम पवार, स्वप्निल वक्ते,अजय थोरात, शंकर निर्मळ आदि.सहभागी झाले होते.

गतिरोधक नसल्याने भालचंद्र विद्यालयातील शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात

—–
लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर असुन गतिरोधक नसल्याने त्यांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून वारंवार याठिकाणी अपघात घडत आहेत. यापुर्वीही दि.२८आगस्ट २०२१ रोजी भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी गतिरोधकाची मागणी करत अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून “श्रद्धांजली गांधीगिरी”आंदोलन केले होते.

बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती आंदोलनात सामील ,


शालेय मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामूळे आजच्या आंदोलनात बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती महाराज सामिल झाले होते.आंदोलना दरम्यान आजारी रूग्णाला रस्ता मोकळा करून दिला.

कर्जत येथे तालूका पत्रकार संघ व जिल्हा पत्रकार संघ सन्मान सोहळ्याव्याला उपस्थित रहा – पवार, पठाण

Picsart 23 04 06 04 16 09 845 scaled

खा.संजय राऊत, मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, आ.रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती

पाटोदा / प्रतिनीधी:

मराठी पञकार परीषदेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजीत आदर्श तालूका व जिल्हा संघाचा सन्मान सोहळा. तालूकाध्यक्षाचा मेळावा शुक्रवार ७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. शिवसेना नेते सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाने सहभागी व्हावे व मोठ्या संख्येने पञकार बांधवानी उपस्थीत राहवे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिन पवार शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या धयेयधोरणा नुसार सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील ४८ तालुका पत्रकार संघांना परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ६ जिल्हा संघांना देखील सन्मानीत करण्यात आले आहे. राज्यातील अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघटन मजबुत करण्या बरोबरच पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्या साठी काम करीत असतात. त्याच बरोबर सामाजिक बांधीलकी जपत विविध सामाजिक उपक्रम देखील राबवित असतात. त्यांच्या या कार्याचं राज्यस्तरावर कौतूक व्हावं, राज्य पातळीवर त्याच्या कामाची दखल घेतली जावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सहा वर्षां पासून परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि स्व. रंगाआण्णा वैध यांच्या नावे आदर्श जिल्हा संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागात घेतले जातात यावर्षीचे हे सातवे वर्ष असून कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथे खा. संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. आ. रोहीत पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे तर यावेळी विश्वस्त किरण नाईक व अध्यक्ष शरद पाबळे, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, अनिल वाघमारे, सुभाष चौरे, विशाल साळुंखे व इतर पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत.कर्जत येथे शुक्रवारी होत असलेल्या सोहळ्यास पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष सचिन पवार व शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी केले आहे..

वन्यजीवांसाठी पानवठे की वनविभागातील आधिका-यांचे पोटभरणासाठी पाणपोई ;शंभर फुटावर रस्ता तर ५०० फुटावर खडीक्रशर मशिन

IMG 20230402 WA0045

बीड(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील करचुंडी गटातील वनविभागातील आधिका-यांनी वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पानवठ्यांच्या नावाखाली लिंबागणेश ते पालवण रस्त्यावर नामाजीबुवा देवस्थान समोर १०० फुट अंतरावर नविन पानवठे बांधण्यात आले असून शेजारीच ५०० फुट अंतरावर खडीक्रशर मशिन सुरु असुन या ठिकाणी वन्यजीव कसे पाणी पिण्यासाठी येणार?मग हे पानवठे वन्यजीव प्राण्यांसाठी बांधले आहेत की वनविभागातील आधिका-यांचे पोट भरण्यासाठी बांधलेल्या पाणपोई आहेत असा प्रश्न पडला आहे.

परभणी जिल्ह्यातील कमी मजुरीवर वनमजुर, कागदोपत्री मात्र वनविभागातील आधिकारी -कर्मचा-यांचे नातेवाईक
—-
वनविभागाच्या सीसीटी, चर खोदणे आदि.कामासाठी परभणी जिल्ह्यातील मजुर असुन त्यांच्याकडुन कमी मजुरीत काम करून घेतले जाते मात्र रजिस्टर वर वनविभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे नातेवाईक, जवळची मित्र मंडळी यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. संबंधित प्रकरणात सखोल चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.

पाण्यासाठी वणवण, पिंपरनई गावच्या जनावरांना बेलगावच्या भोनाई तलावाचा आधार – डाॅ.गणेश ढवळे

IMG 20230402 WA0024

लिंबागणेश (प्रतिनिधी): ऊन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असुन गावतलावातील पाण्याची पातळी खालावली असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडून शेजार गावच्या शिवारातील साठवण तलावावर जनावरांची तहान भागवावी लागत असून अजुन एप्रिल-जुनचा उन्हाळा आणखी कडक जाणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण:- रामचंद्र वायभट (पिंपरनई शेळीपालक)

बीड तालुक्यातील मौजे.पिपरनई येथील रामराव वायभट यांच्या ५० शेळ्या तसेच ईतर म्हशी, गाय-बैल, यांना पिंपरनई येथील तलाव आडवळणी असल्या कारणाने बेलगाव शिवारातील बेलेश्वर मंदिर परीसरातील भोनाई तलावाचा आसरा घ्यावा लागत आहे.

जिल्हाप्रशासनाचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच कठोर उपाययोजना राबवावी:- डाॅ.गणेश ढवळे

हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल-निनो प्रभाव मान्सुनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या अनुषंगानेच आगामी काळात पाणीटंचाई जाणवु नये यासाठी जिल्हाप्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड पाणीटंचाई विभाग संतोष राऊत यांच्या आदेशाने पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत मोटारी व अन्य साधनाद्वारे करण्यात येणारा अवैध पाणीउपसा रोखण्याकरीता तात्काळ संबधित पाटबंधारे विभाग आधिकारी,कर्मचारी,गटविकास आधिकारी कार्यालयातील कर्मचारी, व महावितरणचे कर्मचारी यांची संयुक्त पथके सर्व तहसिलदार यांनी स्थापित करून अवैध पाणी उपस्यावर प्रतिबंध घालण्यात यावा आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा म्हटले आहे परंतु केवळ कागदोपत्रीच उपाययोजना राबविण्यात येत असून हितसंबंध जोपासत जिल्हाप्रशासनाची खोटा अहवाल सादर करून दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच कठोर पणे उपाययोजना करण्यात यावी.

आष्टी तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठयांकडून सामान्य जनतेची पिळवणूक ?

image editor output image 1824716135 1680032222264

आष्टी (अशोक गर्जे): तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठी यांच्याकडून सामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर माहिती अशी की तलाठी सज्जा हिवरा येथील तलाठी कार्यालय १५ दिवसाला एकदा उघडते
सामान्य जनतेला नाहक त्रास होत असून प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही कार्यालय उघडते १२ वाजता याची दखल कोण घेणार कधी हा प्रश्न सुटणार ? सात बारा लागत असेल तर आष्टी ला जावे लागते. हिवरा ते आष्टी अंतर ३० किमी असून तलाठी यांची सामान्य जनतेची कामे करण्याची इच्छा नसल्याची दिसून येते अशा प्रशासकीय कामगारांवर काय कार्यवाही होणार ? अशी मागणी गावागावांतून होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनाधिकृत व आरोग्यास घातक असलेले धनगर जवळका येथील डांबरीकरण केंद्र व खडीक्रेशन बंद करा – शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी

IMG 20230323 WA0065

पाटोदा ( प्रतिनिधी ): तालुक्यातील धनगर जवळका ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्र.५२अ शेजारी डांबरीकरण व खडीक्रेशन प्रकल्प उभारला जात असुन त्यापैकी डांबरीकर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे सदरील प्रकल्पा मुळे मोठ्या प्रमाणात डांबरीचा आरोग्यस घातक असा काळा धूर निर्माण होत आहे.त्या धुराचे योग्य प्रकारे नियोजन न केल्या मुळे तसेच धूर सोडणाऱ्या उपकरणाची उंची कमी असल्या कारणाने शेजारील उभ्या असणाऱ्या ज्वारी गहू कांदा खरबूज सीताफळ पिकास व शेतकऱ्यांच्या आरोग्यास धुरामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधीत ठेकेदारास सर्वे.क्र.५२अ तलाठी कार्यालय धनगर जवळका येथील शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे हे धुराच्या नियोजनाबाबत व होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देण्यासाठी गेले असता संबंधीत ठेकेदारानी शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे या शेतकऱ्यास त्याचे कुठलेही मत विचारात न घेता अरेरावीची भाषा वापरून तुम्ही पिक घेऊ नका जमीन विका आशा प्रकारे दम दिला या शेतकऱ्यचा मुलगा कोरोना काळात मयत झाला असुन त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा (एक मुलगी,पत्नी ) यांचा उधरनिर्वाह या जमिनीवरच अवलंबून आहे.आशा वेळी सदरील ठेकेदाराने शेती योग्य कृषिक जमिनीत डांबरीकरण व सुरु होणाऱ्या खडीक्रेशन प्रकल्प उभारून सर्वे क्र.५२ अ मधील शेतकऱ्यांच्या पिकास धोका निर्माण केला आहे.तसेच जमीन कशाला पिकवता अशाप्रकारे बोलून तुम्ही माझे काहीच करू शकत नाहीत तुम्हाला कुठे जायचे तेथे जा असा दम दिला आहे. अगोदरच कोरोना मुळे मुलगा मयत झाल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब हलाखीच्या परीस्थित जीवन जगत आहोत.त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने जीवन कसे जगावे हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. शेतकऱ्यांनी खरबूज, सिताफळ या पिकाची लागवड करून दिवसरात्र मेहनत करून पिक घेतले आहे या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे संबधीत ठेकेदारामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उधरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण या प्रकरणाची योग्य दखल घेऊन मला न्याय द्याल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच तक्रारी मुळे संबधीत ठेकेदाराकडून माझ्या जिवितास धोका निर्माण होऊन शकतो. भविष्यात माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या जिवितास कुठल्याही प्रकारची इजा/शारीरिक हानी /वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधीत ठेकेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे सदर निवेदन शेतकरी पांडुरंग वामनराव खाडे यांनी १.मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य २.मा.पालकमंत्री, जिल्हा बीड ३.मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय बीड ४.मा.उपविभागीय अधिकारी साहेब,(SDO) उपविभागीय कार्यालय पाटोदा ५.पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड ६.पोलीस स्टेशन,पाटोदा, ७.ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत,कार्यालय धनगर जवळका यांना दिले आहे.
तसेच या निवेदनावर बाबासाहेब ढेकळे,पांङूरंग गोरे ,उषा गोरे ,छञपती साबळे ,आकाश गर्जे,पोपट खाङे,नामदेव खाङे ,दादासाहेब खाङे यांच्या सह्या आहेत.

मी खङीक्रेशर ला परवाना दिला नाही तर मला गुत्तेदार यांनी उलट उत्तर दिले परवाना देऊ नका मी सिईओ कङून परवाना घेईल ―प्रगती खेङकर (ग्रामसेवक धनगरजवळका)

पोखरी (घाट) ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधले ‘ज्ञानमंदिर’ उर्वरीत बांधकाम निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

IMG 20221222 WA0037

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील मौजे पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजुरांनी उचल घेत लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून जिल्हापरिषदेची टोलेजंग ईमारत उभा केली. उर्वरीत कामासाठी ग्रामस्थांनी आज दिनांक.२२ डिसेंबर गुरूवार रोजी सीईओ जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भेट घेऊन मदत मागितली अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत निधी देण्याचे मान्य करून शाळेला भेट देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. … Read more

बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी

IMG 20221222 192732 592

बीड(प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन काल फिलिपिन्स देशातील नामांकित दवाओ शहरात मुंडे भक्त डॉ ऋषिकेश विघ्ने, डॉ महेश घुगे, डॉ स्वप्निल ठोंबरे यांच्या सह असंख्य विद्यार्थी डॉक्टरांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित डॉ धनंजय आंधळे, डॉ शशिकांत दुधरे, डॉ नवविवेक सिंग,डॉ विशाल भुतेकर, डॉ अभिलाष हर्ष सिंग, डॉ अक्षय नागरगोजे ,डॉ तुषार चौधरी, डॉ आदित्य बांगर, डॉ रोहन आंधळे, डॉ आदित्य बांगर, डॉ निशांत सानप,डॉ प्रतिक शिंदे होते.

सरपंच पदासाठी सामाजिक कार्यकर्ते आमजेद शेख ग्रामस्थांच्या चर्चेत

कडा:आठवडा विशेष ― सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेते कार्यककीच्या तयारीला लागली आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते, तडफदार नेतृत्व श्री.आमजेद शेख यांन सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत सामजिक कार्यात पुढाकार घेऊन स्वखर्चातून पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम केले, वृक्षरोपण असो किंवा गावातील शाळा प्रश्नावर नेहमी पुढाकार घेऊन सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचे काम . नेहमीच आमजेद शेख यांनी केला. काही अडचण असेल तर सातत्याने पाठपुरावा करून मदत मिळून देणार सदैव जनतेच्या सेवेसाठी चोवीस तारा उपलब्ध राहून कुठल्याही प्रकारचा गर्व न करता नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतो माणूस त्यांच्या जवळ काम घेऊन गेला की से काम शंभर टक्के होणारच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अस वाटतेय कि आमजेद शेख यांना एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी. गावा विषयी तन मन धनाने काम करणाऱ्या या ध्येय कार्यका एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावातील सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर आणि ग्रामस्थांमधून होत आहे. होतकरू मुलगा जर गावाला सरपंच झाला तर गावाचा नक्कीच विकास होईल असा सूर सामान्य जनतेतून नित आहे. निर्व्यसनी गुणवान ओळख असलेला तालुक्यातील सर्वच राजकीय दायी असलेले संबंध व समाजसेवेची आवड असल्यामुळे सर्वसामान्याचे प्रश्न सोडणे आणखीनच सोपे जाईल यात शंका नाही अशी चर्चा

जर्नालिस्ट यांना शासकीय कार्यालयातुन मेल किंवा मोबाईल द्वारे माहीती मिळण्यासाठी जर्नालिस्ट नानासाहेब डिडुळ यांनी केला मुख्यमंञी शिंदेंना मेल

IMG 20221114 WA0010

बीड (प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका या छोट्याशा खेङ्यामधुन दररोज 50 किलोमीटर बीङ येथे जाऊन पञकारीतेतील जर्नालिस्ट (MA mcj) ही पदवी खुप मेहनतीने नानासाहेब मोतीराम ङिङूळ यांनी मिळवली आहे .
नानासाहेब हे आत्ता एका विभागीय पेपरचे काम करत आहेत परंतु गोरगरीब नागरिकांच्या खुप समस्या असतात ते शासकीय दप्तरी ते अर्ज पण करतात परंतु शासकीय कर्मचारी त्यांच्या मर्जीतील लोकांना दाखवतात नाहीतर तो अर्ज तक्रार तशीच दखल न घेता ठेवली जाते.
गोरगरीब जनतेला त्यांची समस्या घेऊन जर्नालिस्ट पर्यंत पोहचता येत नाही त्यांची बाजु जर्नालिस्ट पर्यंत सांगता येत नाही.
मा.मुख्यमंञी साहेब तालुका निहाय येणारे तहसिल ,पोलीस स्टेशन,पंचायत समिती, वनविभाग, बांधकाम विभाग, व इतर सर्व कार्यालयांनी मेल व मोबाईल द्वारे जर्नालिस्ट यांना माहीती पोहच व्हावी म्हणुन मुख्यमंञी साहेब यांनी परीपञक काढावे अशी मागणी जर्नालिस्ट नानासाहेब मोतीराम डिडुळ यांनी मेल द्वारे मुख्यमंञी यांना केली आहे.

दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मांजरा-साळ नदीवरील पुल वाहुन गेला; ठेकेदार-आधिका-यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण – डाॅ.गणेश ढवळे

img 20221023 wa00337664388013309704929

पाटोदा: शहरातील मांजरा-साळ नदीच्या संगमावरील पुल ठेकेदार-कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असून थातूरमातूर निकृष्ट काम करून निधी उचलण्याची पाटोदा नगरपंचायत साठी नित्याचेच काम असून संबधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी तसेच नवीन सिमेंट क्राॅक्रीट पुल बांधण्यात यावा यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी पुलावर ठीय्या आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड,उपविभागीय आधिकारी, तहसिलदार पाटोदा,मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे.

स्मशानभुमी, ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय याच मार्गावर


जुन्या पाटोदा शहरातुन या पुलाच्या मार्गावर सार्वजनिक स्मशानभुमी,ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय तसेच भाकरे वस्ती,लऊळ वस्ती,बामदळे वस्ती,असुन या भागातील रहिवाशांना दरवर्षीच पावसाळ्यात पुल वाहुन गेल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली,गुरुवारी पुलावर ठीय्या आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे


विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी दि.३ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ.गणेश ढवळे यांच्या ३१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या तक्रारीवरून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश काढून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळेच दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी याच पुलावर ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.