आष्टी (अशोक गर्जे): तालुक्यातील हिवरा सज्जाचे तलाठी यांच्याकडून सामान्य जनतेची पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर माहिती अशी की तलाठी सज्जा हिवरा येथील तलाठी कार्यालय १५ दिवसाला एकदा उघडते
सामान्य जनतेला नाहक त्रास होत असून प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही कार्यालय उघडते १२ वाजता याची दखल कोण घेणार कधी हा प्रश्न सुटणार ? सात बारा लागत असेल तर आष्टी ला जावे लागते. हिवरा ते आष्टी अंतर ३० किमी असून तलाठी यांची सामान्य जनतेची कामे करण्याची इच्छा नसल्याची दिसून येते अशा प्रशासकीय कामगारांवर काय कार्यवाही होणार ? अशी मागणी गावागावांतून होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
बीड जिल्हा
बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट 1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो.बीड जिल्ह्यात पाटोदा,आष्टी,शिरूर,गेवराई,बीड, माजलगाव, धारूर,परळी,अंबाजोगाई,वडवणी,केज ही तालुके आहेत.साप्ताहिक आठवडा विशेष प्रथमतः पाटोदा तालुक्यातुन सुरू करण्यात आला.नंतर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांना आपल्या न्यूजपोर्टल मार्फत प्रसिद्धी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले.
अनाधिकृत व आरोग्यास घातक असलेले धनगर जवळका येथील डांबरीकरण केंद्र व खडीक्रेशन बंद करा – शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी
पाटोदा ( प्रतिनिधी ): तालुक्यातील धनगर जवळका ग्रामपंचायत हद्दीत सर्वे क्र.५२अ शेजारी डांबरीकरण व खडीक्रेशन प्रकल्प उभारला जात असुन त्यापैकी डांबरीकर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे सदरील प्रकल्पा मुळे मोठ्या प्रमाणात डांबरीचा आरोग्यस घातक असा काळा धूर निर्माण होत आहे.त्या धुराचे योग्य प्रकारे नियोजन न केल्या मुळे तसेच धूर सोडणाऱ्या उपकरणाची उंची कमी असल्या कारणाने शेजारील उभ्या असणाऱ्या ज्वारी गहू कांदा खरबूज सीताफळ पिकास व शेतकऱ्यांच्या आरोग्यास धुरामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधीत ठेकेदारास सर्वे.क्र.५२अ तलाठी कार्यालय धनगर जवळका येथील शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे हे धुराच्या नियोजनाबाबत व होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देण्यासाठी गेले असता संबंधीत ठेकेदारानी शेतकरी श्री.पांडुरंग वामन खाडे या शेतकऱ्यास त्याचे कुठलेही मत विचारात न घेता अरेरावीची भाषा वापरून तुम्ही पिक घेऊ नका जमीन विका आशा प्रकारे दम दिला या शेतकऱ्यचा मुलगा कोरोना काळात मयत झाला असुन त्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा (एक मुलगी,पत्नी ) यांचा उधरनिर्वाह या जमिनीवरच अवलंबून आहे.आशा वेळी सदरील ठेकेदाराने शेती योग्य कृषिक जमिनीत डांबरीकरण व सुरु होणाऱ्या खडीक्रेशन प्रकल्प उभारून सर्वे क्र.५२ अ मधील शेतकऱ्यांच्या पिकास धोका निर्माण केला आहे.तसेच जमीन कशाला पिकवता अशाप्रकारे बोलून तुम्ही माझे काहीच करू शकत नाहीत तुम्हाला कुठे जायचे तेथे जा असा दम दिला आहे. अगोदरच कोरोना मुळे मुलगा मयत झाल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब हलाखीच्या परीस्थित जीवन जगत आहोत.त्यात पिकाचे नुकसान होत असल्याने जीवन कसे जगावे हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. शेतकऱ्यांनी खरबूज, सिताफळ या पिकाची लागवड करून दिवसरात्र मेहनत करून पिक घेतले आहे या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे संबधीत ठेकेदारामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उधरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण या प्रकरणाची योग्य दखल घेऊन मला न्याय द्याल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच तक्रारी मुळे संबधीत ठेकेदाराकडून माझ्या जिवितास धोका निर्माण होऊन शकतो. भविष्यात माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या जिवितास कुठल्याही प्रकारची इजा/शारीरिक हानी /वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधीत ठेकेदार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे सदर निवेदन शेतकरी पांडुरंग वामनराव खाडे यांनी १.मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य २.मा.पालकमंत्री, जिल्हा बीड ३.मा.जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय बीड ४.मा.उपविभागीय अधिकारी साहेब,(SDO) उपविभागीय कार्यालय पाटोदा ५.पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड ६.पोलीस स्टेशन,पाटोदा, ७.ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत,कार्यालय धनगर जवळका यांना दिले आहे.
तसेच या निवेदनावर बाबासाहेब ढेकळे,पांङूरंग गोरे ,उषा गोरे ,छञपती साबळे ,आकाश गर्जे,पोपट खाङे,नामदेव खाङे ,दादासाहेब खाङे यांच्या सह्या आहेत.
मी खङीक्रेशर ला परवाना दिला नाही तर मला गुत्तेदार यांनी उलट उत्तर दिले परवाना देऊ नका मी सिईओ कङून परवाना घेईल ―प्रगती खेङकर (ग्रामसेवक धनगरजवळका)
पोखरी (घाट) ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधले ‘ज्ञानमंदिर’ उर्वरीत बांधकाम निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद
लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील मौजे पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजुरांनी उचल घेत लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून जिल्हापरिषदेची टोलेजंग ईमारत उभा केली. उर्वरीत कामासाठी ग्रामस्थांनी आज दिनांक.२२ डिसेंबर गुरूवार रोजी सीईओ जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भेट घेऊन मदत मागितली अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत निधी देण्याचे मान्य करून शाळेला भेट देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. … Read more
बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी
बीड(प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन काल फिलिपिन्स देशातील नामांकित दवाओ शहरात मुंडे भक्त डॉ ऋषिकेश विघ्ने, डॉ महेश घुगे, डॉ स्वप्निल ठोंबरे यांच्या सह असंख्य विद्यार्थी डॉक्टरांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित डॉ धनंजय आंधळे, डॉ शशिकांत दुधरे, डॉ नवविवेक सिंग,डॉ विशाल भुतेकर, डॉ अभिलाष हर्ष सिंग, डॉ अक्षय नागरगोजे ,डॉ तुषार चौधरी, डॉ आदित्य बांगर, डॉ रोहन आंधळे, डॉ आदित्य बांगर, डॉ निशांत सानप,डॉ प्रतिक शिंदे होते.
सरपंच पदासाठी सामाजिक कार्यकर्ते आमजेद शेख ग्रामस्थांच्या चर्चेत
कडा:आठवडा विशेष ― सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेते कार्यककीच्या तयारीला लागली आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते, तडफदार नेतृत्व श्री.आमजेद शेख यांन सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत सामजिक कार्यात पुढाकार घेऊन स्वखर्चातून पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम केले, वृक्षरोपण असो किंवा गावातील शाळा प्रश्नावर नेहमी पुढाकार घेऊन सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचे काम . नेहमीच आमजेद शेख यांनी केला. काही अडचण असेल तर सातत्याने पाठपुरावा करून मदत मिळून देणार सदैव जनतेच्या सेवेसाठी चोवीस तारा उपलब्ध राहून कुठल्याही प्रकारचा गर्व न करता नागरिकांच्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असतो माणूस त्यांच्या जवळ काम घेऊन गेला की से काम शंभर टक्के होणारच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अस वाटतेय कि आमजेद शेख यांना एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी. गावा विषयी तन मन धनाने काम करणाऱ्या या ध्येय कार्यका एकदा सरपंच पदासाठी संधी द्यावी अशी चर्चा गावातील सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर आणि ग्रामस्थांमधून होत आहे. होतकरू मुलगा जर गावाला सरपंच झाला तर गावाचा नक्कीच विकास होईल असा सूर सामान्य जनतेतून नित आहे. निर्व्यसनी गुणवान ओळख असलेला तालुक्यातील सर्वच राजकीय दायी असलेले संबंध व समाजसेवेची आवड असल्यामुळे सर्वसामान्याचे प्रश्न सोडणे आणखीनच सोपे जाईल यात शंका नाही अशी चर्चा
जर्नालिस्ट यांना शासकीय कार्यालयातुन मेल किंवा मोबाईल द्वारे माहीती मिळण्यासाठी जर्नालिस्ट नानासाहेब डिडुळ यांनी केला मुख्यमंञी शिंदेंना मेल
बीड (प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका या छोट्याशा खेङ्यामधुन दररोज 50 किलोमीटर बीङ येथे जाऊन पञकारीतेतील जर्नालिस्ट (MA mcj) ही पदवी खुप मेहनतीने नानासाहेब मोतीराम ङिङूळ यांनी मिळवली आहे .
नानासाहेब हे आत्ता एका विभागीय पेपरचे काम करत आहेत परंतु गोरगरीब नागरिकांच्या खुप समस्या असतात ते शासकीय दप्तरी ते अर्ज पण करतात परंतु शासकीय कर्मचारी त्यांच्या मर्जीतील लोकांना दाखवतात नाहीतर तो अर्ज तक्रार तशीच दखल न घेता ठेवली जाते.
गोरगरीब जनतेला त्यांची समस्या घेऊन जर्नालिस्ट पर्यंत पोहचता येत नाही त्यांची बाजु जर्नालिस्ट पर्यंत सांगता येत नाही.
मा.मुख्यमंञी साहेब तालुका निहाय येणारे तहसिल ,पोलीस स्टेशन,पंचायत समिती, वनविभाग, बांधकाम विभाग, व इतर सर्व कार्यालयांनी मेल व मोबाईल द्वारे जर्नालिस्ट यांना माहीती पोहच व्हावी म्हणुन मुख्यमंञी साहेब यांनी परीपञक काढावे अशी मागणी जर्नालिस्ट नानासाहेब मोतीराम डिडुळ यांनी मेल द्वारे मुख्यमंञी यांना केली आहे.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मांजरा-साळ नदीवरील पुल वाहुन गेला; ठेकेदार-आधिका-यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण – डाॅ.गणेश ढवळे
पाटोदा: शहरातील मांजरा-साळ नदीच्या संगमावरील पुल ठेकेदार-कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असून थातूरमातूर निकृष्ट काम करून निधी उचलण्याची पाटोदा नगरपंचायत साठी नित्याचेच काम असून संबधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी तसेच नवीन सिमेंट क्राॅक्रीट पुल बांधण्यात यावा यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी पुलावर ठीय्या आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड,उपविभागीय आधिकारी, तहसिलदार पाटोदा,मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे.
स्मशानभुमी, ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय याच मार्गावर
जुन्या पाटोदा शहरातुन या पुलाच्या मार्गावर सार्वजनिक स्मशानभुमी,ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय तसेच भाकरे वस्ती,लऊळ वस्ती,बामदळे वस्ती,असुन या भागातील रहिवाशांना दरवर्षीच पावसाळ्यात पुल वाहुन गेल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली,गुरुवारी पुलावर ठीय्या आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे
विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी दि.३ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ.गणेश ढवळे यांच्या ३१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या तक्रारीवरून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश काढून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळेच दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी याच पुलावर ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.