पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार, क्रेन पडल्याने शेतीपिकांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ – डॉ.गणेश ढवळे

8a46b74c da84 4579 98ef 3abd4e5c2ace

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बालाघाटावर आणि पाटोदा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी कंपन्यांचा सुळसुळाट असुन शेतकऱ्यांची फसवणूक करत मनमानी कारभार सुरू असुन शासकीय पाणंद रस्त्यावर अतिक्रमण असो अथवा वाहनांसाठी रस्ता करताना संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उभ्या पिकातुन नुकसान करत वहिवाट असो याविषयी कोणालाही न विचारता अरेरावी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा गुरुबा दाभाडे व नितिन दशरथ दाभाडे यांच्या शेतपिकांचे पवनचक्की उभारतानाचे क्रेन पडल्याने पिकांचे व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीन पिकांचे तसेच झाडांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ:- भैरूबा दाभाडे

ff3b0eec 5ce3 46aa 91ab c2779f5f5010
लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा दाभाडे व नितिन दाभाडे यांच्या शेताशेजारी पवनचक्की उभारत असताना मध्यरात्री क्रेन पडल्याने झाडांचे व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.मध्यरात्री क्रेन पडल्याने अनर्थ टळला नाहीतर एरवी दिवसा त्याच झाडाखाली माणसं आणि जनावरे बांधलेली असतात.मध्यरात्री क्रेन पडल्याने जिवित हानी झाली नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे गत झाली आहे.रात्रभर जागून पिकाला पाणी दिले परंतु क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पवन प्रकल्प कंपन्यांची दादागिरी सुरू असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे:- डॉ.गणेश ढवळे
89cbc520 0cd8 4a16 a00b deb4c1fca171

बीड आणि पाटोदा तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार-या रेणु पावर कंपनी आणि सहयोगी वेदांश इन्फ्रा कंपनी यांनी स्थानिक दलालांच्या मदतीने शेतकऱ्यांची फसवणूक करुन जमिनी कवडीमोल भावाने लुबाडलेल्याच आहेत.परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील शिवरस्ते, पाणंद रस्ते यावर सुद्धा अतिक्रमण केले आहे.पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील शेतकरी जयवंत शिंदे यांना पवन ऊर्जा कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला होता.रस्ता खुला करण्यात यावा यासाठी १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणानंतर रस्ता खुला करून देण्यात आला. अशिक्षित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या कंपन्या करत असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

लिंबागणेश येथे दिवसाच कमलबाई खिल्लारे यांच्या घरी चोरी

234e791c ed52 4409 9ae7 65555713c96c

आठवडा विशेष (प्रतिनिधी):

आज दि.३० जुलै रविवार रोजी सकाळी रानात कामासाठी गेलेल्या श्रीमती कमलबाई भगवान खिल्लारे वय ६० वर्षे आपल्या नातीसह पल्लवी वय १४ वर्षे दररोज प्रमाणे स्वतः:च्या शेतात कामासाठी गेले होते.सायंकाळी ५ वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. भाचा दिनेश वायभट यांना कळवले असता त्यांनी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. राऊत संतोष यांना फोनवरून चोरीच्या घटनेची कल्पना दिली असता.पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील व पो.हे.संतोष राऊत घटनास्थळी दाखल झाले. श्रीमती कमलबाई खिल्लारे यांच्या म्हणण्यानुसार काही रोख रक्कम व सोनं चोरीला गेल्याचे सांगितले.पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.

महिनाभरापासुन डोळ्याच्या आपरेशन मुळे घरीच असणा-या कमलबाई आजच शेतात कामासाठी गेल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधकासाठी रास्ता रोको

IMG 20230504 WA0028

बीड:अहमदनगर -अहमदपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डी मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता मोरगाव फाटा,मुळुकवाडी,लिंबा गणेश बसस्थानक, भालचंद्र माध्यमिक विद्यालय,महाजनवाडी फाटा,वैद्यकिन्ही,सौंदाना, सोनेगाव फाटा व ग्रामीण रूग्णालय पाटोदा याठीकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.४ मे गुरुवार रोजी सकाळी १०वा लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निवेदन पोलिस उपनिरीक्षक नेकनुर पोलिस स्टेशन पानपाटील, पोह.डिडुळ, खांडेकर,खटाने, क्षीरसागर, ढाकणे,मंडळ अधिकारी वंजारी, तलाठी पोतदार, कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक राजेभाऊ आप्पा गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, लेहनाजी गायकवाड सुरेश निर्मळ , विक्रांत वाणी, अशोक वाणी,दादा गायकवाड, हरिओम क्षीरसागर जितेंद्र निर्मळ, तुळशीराम पवार, स्वप्निल वक्ते,अजय थोरात, शंकर निर्मळ आदि.सहभागी झाले होते.

गतिरोधक नसल्याने भालचंद्र विद्यालयातील शालेय मुलांची सुरक्षा धोक्यात

—–
लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर असुन गतिरोधक नसल्याने त्यांच्या सुरक्षितता धोक्यात आली असून वारंवार याठिकाणी अपघात घडत आहेत. यापुर्वीही दि.२८आगस्ट २०२१ रोजी भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी गतिरोधकाची मागणी करत अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून “श्रद्धांजली गांधीगिरी”आंदोलन केले होते.

बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती आंदोलनात सामील ,


शालेय मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामूळे आजच्या आंदोलनात बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महादेव भारती महाराज सामिल झाले होते.आंदोलना दरम्यान आजारी रूग्णाला रस्ता मोकळा करून दिला.

पाण्यासाठी वणवण, पिंपरनई गावच्या जनावरांना बेलगावच्या भोनाई तलावाचा आधार – डाॅ.गणेश ढवळे

IMG 20230402 WA0024

लिंबागणेश (प्रतिनिधी): ऊन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत असुन गावतलावातील पाण्याची पातळी खालावली असुन जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गाव सोडून शेजार गावच्या शिवारातील साठवण तलावावर जनावरांची तहान भागवावी लागत असून अजुन एप्रिल-जुनचा उन्हाळा आणखी कडक जाणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण:- रामचंद्र वायभट (पिंपरनई शेळीपालक)

बीड तालुक्यातील मौजे.पिपरनई येथील रामराव वायभट यांच्या ५० शेळ्या तसेच ईतर म्हशी, गाय-बैल, यांना पिंपरनई येथील तलाव आडवळणी असल्या कारणाने बेलगाव शिवारातील बेलेश्वर मंदिर परीसरातील भोनाई तलावाचा आसरा घ्यावा लागत आहे.

जिल्हाप्रशासनाचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच कठोर उपाययोजना राबवावी:- डाॅ.गणेश ढवळे

हिंदी महासागरात निर्माण झालेल्या अल-निनो प्रभाव मान्सुनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या अनुषंगानेच आगामी काळात पाणीटंचाई जाणवु नये यासाठी जिल्हाप्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड पाणीटंचाई विभाग संतोष राऊत यांच्या आदेशाने पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत मोटारी व अन्य साधनाद्वारे करण्यात येणारा अवैध पाणीउपसा रोखण्याकरीता तात्काळ संबधित पाटबंधारे विभाग आधिकारी,कर्मचारी,गटविकास आधिकारी कार्यालयातील कर्मचारी, व महावितरणचे कर्मचारी यांची संयुक्त पथके सर्व तहसिलदार यांनी स्थापित करून अवैध पाणी उपस्यावर प्रतिबंध घालण्यात यावा आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा म्हटले आहे परंतु केवळ कागदोपत्रीच उपाययोजना राबविण्यात येत असून हितसंबंध जोपासत जिल्हाप्रशासनाची खोटा अहवाल सादर करून दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच कठोर पणे उपाययोजना करण्यात यावी.

पोखरी (घाट) ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून बांधले ‘ज्ञानमंदिर’ उर्वरीत बांधकाम निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद

IMG 20221222 WA0037

लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील मौजे पोखरी (घाट) येथील ऊसतोड मजुरांनी उचल घेत लोकवर्गणीतून ३२ लाख रूपये खर्चून जिल्हापरिषदेची टोलेजंग ईमारत उभा केली. उर्वरीत कामासाठी ग्रामस्थांनी आज दिनांक.२२ डिसेंबर गुरूवार रोजी सीईओ जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भेट घेऊन मदत मागितली अजित पवार यांनी त्यांचे कौतुक करत निधी देण्याचे मान्य करून शाळेला भेट देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. … Read more