मुंबई, दि. 21 : राज्यात दि. 1 जुलै ते दि. 20 जुलै पर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 19 लाख 48 हजार 430 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 19 लाख 48 हजार 430 आणि असे एकूण दि.1 एप्रिल ते दि. 20 जुलै या कालावधीत 1 कोटी 9 लाख 27 हजार 959 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.