प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

लॉकडाऊन काळात ५६० सायबर गुन्हे दाखल

मुंबई दि.२५- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५६० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २१ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप – २१० गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –२३८ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ – २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट – ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६२ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २९० आरोपींना अटक.

■ ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागातील गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे .

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात ,आपल्या फेसबुक प्रोफाईलवर राजकीय व धार्मिक तेढ निर्माण करू शकणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट टाकली होती त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button