पाटोदा:गणेश शेवाळे― महाराष्ट्राचे नवे तर अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाही पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पाटोदा शहराच्या प्रमुख बाजारपेठे मध्ये सर्वत्र अंधारच अंधार असतो त्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपराञी मध्ये व्यापार पेठ असल्याने चोऱ्याही होऊ शकतात तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक निघते त्या मिरवणूकिला अडथळा ही होऊ शकतो यामुळे तात्काळ पाटोदा नगरपंचायतने शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेल्या छञपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावरील विद्युत पोल वर तात्काळ विद्युत दिवे बसवावे अशी मागणी पाटोदा शहराचे माजी लोकप्रिय सरपंच संतोष दादा जाधव यांनी केली.