बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

भेदभाव नको संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी द्यावी : अकबर खाँ पठाण

अंबाजोगाई (वार्ताहर):
अंबाजोगाईची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा,लहान मोठे व्यापारी,व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे अंबाजोगाई शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.१५ दिवसांच्या संचारबंदीमुळे रूग्णसंख्या वेगाने कमी होत असून,मृत्युचे प्रमाणही घटले आहे.त्यामुळे अंबाजोगाईत बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे तालुकाध्यक्ष अकबर खाँ पठाण यांनी प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पठाण म्हणाले की,कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दीड वर्षांपासून सर्वांच्याच जीवनावर
विपरित परिणाम झालेला आहे.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सर्वजण कोलमडून पडले आहेत.दैनंदिन गरजा भागविणेही कठिण झाले आहे या मुळे छोटे मोठे व्यापाऱ्या सोबतच हातावर पोट भरणाऱ्या लोकांचा संयम तुटण्याची वाट न बघता सर्व परिस्थितीचा आढावा घेत सर्व बाजारपेठ सुरळीत करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे तालुकाध्यक्ष अकबर खाँ पठाण यांनी केली आहे.यावेळी त्यांनी सांगितले की,नुकतीच शहरातील व्यापारी बांधवांच्या झालेल्या चर्चा व जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे की,अंबाजोगाईतील व्यावसायिक बांधवांनी कायद्याचा आदर राखून प्रशासनाचा सातत्यपूर्ण सहकार्य केले आहे.परंतु,लॉकडाऊन चा कालावधी असाच वाढला तर जनता व व्यापारी यांच्या मनातील असंतोष बघता येणाऱ्या काळात कदाचित त्याचा उद्रेकही होऊ शकतो अशी भिती वाटत आहे,कारण सभोवताली तशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.अंबाजोगाईचे लहान-मोठे व्यावसायिक व नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत असतात.सध्या अंबाजोगाई शहर व तालुक्याचा कोरोना वाढीचा वेगही मंदावलेला आहे.रूग्णालयात पुरेसे ऑक्सिजन बेडही उपलब्ध आहेत.म्हणून आता तरी आढावा घेताना या सर्व सकारात्मक बाजूंचा विचार करून अंबाजोगाईचे सर्व व्यवहार सुरळीत करून सर्वांनाच दिलासा द्यावा अशी विनंती अकबर खाँ पठाण यांनी करत यापुढेही अंबाजोगाईकर प्रशासनाला सहकार्य करतीलच यात शंका नाही.जर या असंतोषाचा उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर जनभावनेचा विचार करून सर्वांनाच न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.अंबाजोगाईच्या सर्वच व्यापारी-व्यावसायिक संघटना नेहमीच सहकार्य करतात,कधीही वातावरण बिघडू देत नाहीत याचाही सकारात्मक विचार व्हावा.काही बंधने घालून सर्वच व्यवहार सुरू करायला परवानगी द्यावी अशी विनंती अकबर खाँ पठाण केली आहे.राज्यात कोरोनाच्या नावाखाली जे निर्बंध आहेत,त्यात आता केवळ अत्यावश म्हणवणाऱ्या काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे,मात्र ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडाले आहेत.रोजच कमवायचं आणि खायचं अशी परिस्थिती असलेल्या हजारो लोकांसमोर आता जगायचाच प्रश्न निर्माण झाला आहे.या बंदमुळे कोरोनाने मरण्याची नव्हे तर यापुढे जगायचं कसे याचीच भीती वाटू लागली आहे.अशा भावना लोक जाहीरपणे व्यक्त करीत आहेत.राज्यात कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली सध्या अनेक व्यवसायांवर बंधने आहेत.बीड जिल्ह्यात तर कालपर्यंत अत्यावश्यक म्हणवल्या जाणाऱ्या व्यवसायांना देखील कुलूप लावण्यात आले होते.ज्यांचे हातावर पोट आहे अशांच्या रोजगाराबद्दल आज कोणीच बोलायला तयार नाही.चपला-बूट शिवणारांपासून ते केश कर्तनालयापर्यंत सारेच व्यवसाय आज बंद अवस्थेत आहेत.गॅरेज,हॉटेल,छोट्या टपऱ्या,कटलरी अशा व्यवसायांवर मोठ्या प्रमाणावर लोक अवलंबून आहेत.या सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.मागील 2 महिन्यांपासून या सर्वांचा रोजगार बंद आहे.त्यामुळे उत्पन्नाचे कोणतेही साधन राहिलेले नाही,उधार उसनवार किती दिवस करायची यालाही काही मर्यादा आहेत.आता कोणी उसने पैसे द्यायला देखील तयार नाही.अशा कठीण परिस्थितीत जगायचे कसे हाच प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.कोरोनाने मरूत किंवा नाही हे माहित नाही.पण,लाचारीने आणि रोज कोणापुढे तरी हात पसरून जगायची भीती आता वाटत आहे अशा भावना लोक व्यक्त करीत आहेत.याचा विचार मायबाप सरकारने करणे आवश्यक असून,अत्यावशक, अनावश्यक असला भेदभाव न करता सरसकट सर्वच व्यवसाय उघडावेत जेणेकरून सर्वसामान्य नागरिक,छोटे व्यापारी घटक,कामगार,गोरगरीब यांना दिलासा मिळेल असा विश्वास युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे तालुकाध्यक्ष अकबर खाँ पठाण यांनी व्यक्त केला आहे.