आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २ :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मुंबईच्या समुद्रकिनारी जुहू बीच येथे आयोजित केलेल्या सचित्र प्रदर्शनास आज समुद्र किनारा पाहावयास आलेल्या अनेक पर्यटकांनी आवर्जून भेट दिली. यावेळी कोविड काळात महाराष्ट्र शासनाने केलेल्या उत्तम कामगिरीची नोंद सामान्य माणसाने घेतली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन १ मे २०२२ पासून भरविण्यात आले असून हे प्रदर्शन ५ मे २०२२ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
या प्रदर्शनास विशेषत: जुहू चौपाटी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, सामान्यजन तसेच समुद्र किनारी फिरावयास आलेल्या पर्यटकांनी भेट दिली.