प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर

आठवडा विशेष टीम―





ठाणे, दि.२२(जिमाका): जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७

अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.







One Comment

  1. महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: १००००+ जागांसाठी अधिसूचना लवकरच! आताच तयारीला लागा!
    महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत १०,००० पेक्षा जास्त पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
    महापोलीस भरती २०२५ ची अधिकृत अधिसूचना नजीकच्या काळात, शक्यतो मे २०२५ मध्ये प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, या भरतीसाठी पोलीस भरती अर्ज २०२५ ऑनलाइन पद्धतीने एप्रिल ते मे २०२५ या दरम्यान स्वीकारले जाऊ शकतात.
    या भरतीमध्ये काय अपेक्षित आहे?
    * रिक्त जागा: १०,००० पेक्षा जास्त पदे (अचूक संख्या अधिसूचनेत येईल).
    * पात्रता: साधारणपणे १२वी उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा अधिसूचनेत स्पष्ट होतील).
    * निवड प्रक्रिया: शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा.
    * अर्ज शुल्क: श्रेणीनुसार (खुला/राखीव) शुल्क असेल.
    तयारीसाठी महत्त्वाचे:
    अधिकृत अधिसूचना येण्यापूर्वीच शारीरिक चाचणी (धावणे, गोळाफेक) आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार (गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण) तयारीला सुरुवात करणे फायदेशीर ठरू शकते. आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, ओळखपत्र, अधिवास, जात प्रमाणपत्र इ.) आताच तयार करून ठेवा.
    कुठे पाहाल माहिती?
    भरतीसंबंधी सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइटला (www.mahapolice.gov.in) नियमितपणे भेट द्या. पोलीस भरती २०२५ महाराष्ट्र संबंधित सर्व घोषणा याच वेबसाइटवर केल्या जातील.
    ही सुवर्णसंधी गमावू नका! आजपासूनच तुमच्या तयारीला वेग द्या आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा भाग बनण्याचे स्वप्न साकार करा!
    #महाराष्ट्रपोलीसभरती२०२५ #महापोलीस #पोलीसभरती #महाराष्ट्रशासकीयनोकरी #पोलीसकॉन्स्टेबल #पोलीसभरतीअधिसूचना #१००००जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button