-
जिल्ह्यात 2446 कोरोनामुक्त, 2082 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.२७:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 2082 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 244 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत 238 जणांचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4766 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात सायंकाळी आढळलेल्या 43 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
-
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण
सिंहगड कॉलनी (1), टिव्ही सेंटर, जाधववाडी (3),विठ्ठलनगर एन-2 (1),खोकडपुरा (2), जयभवानी नगर (1), नॅशनल कॉलनी (2), एम.जी.एम जवळ , एन-6 सिडको (1), गुरू दत्तनगर गारखेडा (1), भगवानपुरा (1), अरिष कॉलनी, कटकट गेट (1), मिलिंद नगर (1), सिटी चौक (1), एन 8 सिडको (1), फुले नगर उस्मानपुरा (1), सादात नगर (1), रेणुकामाता मंदिराजवळ, एन-9 सिडको (3), सुतगिरणी चौक, गारखेडा (1), शिवाजी नगर, सिडको (1),तेरावी योजना, जयभवानी नगर (2), शिवाजी नगर (1),
-
ग्रामीण भागातील रुग्ण
पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), पैठण (1), वरुडकाजी (1), वाळुज, गंगापुर (2),बजाज नगर, वाळुज (1), गल्लेबोरगाव (1), फत्ते मैदान (1), शिवशंभुनगर, वैजापुर (1), बाभुळगांव ,वैजापुर (1), सप्तश्रृंगी कॉलनी, वलदगांव (1), ग्राम पंचायत शेजारी, सातारा परिसर (1), निलकमल हाऊसिग सोसा. बजाज नगर (1), जुने रांजणगांव, (1), वडगांव कोल्हाटी (1), समता कॉलनी वाळुज (1),
-
आज चार जणांचा मृत्यू
आज दिवसभरात घाटीयेथे 4 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत एकूण 238 जणांचा मृत्यू झालेला आहे. आज घाटीमध्ये भोईवाडा येथील 66 वर्षीय पुरूषाचा, बजाजनगर वाळूज येथील 57 वर्षीय पुरषाचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 27 वर्षीय स्त्रीचा, संजय नगर, बायजीपुरा येथील 58 वर्षीय पुरूष रुगणांचा मृत्यू झालेला आहे.