विनायक मेटे आता खरच होतील का मंत्री ?

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

बीड दि.११: नुकताच आज लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मदतीने विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलेले विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.त्यांच्या ह्या पाठिंब्यामागे नेमके काय राजकारण आहे? मेटे आता मंत्री तरी होतील का ? असे प्रश्न सामान्य जनतेच्या समोर येत आहे.विनायक मेटे यांनी ऐन निवडणूकीच्या काळात दिलेला पाठिंबा खरच सोनवणे यांना विजयापर्यंत घेऊन जाईल का ? असे कित्येक प्रश्न आज बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.

विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे.मेटे यांनी याआधीही बऱ्याच वेळेस पंकजा मुंडे यांना वेगवेगळ्या राजकीय मार्गानी विरोध दर्शविला होता.पण त्याचे राजकिय परिणामही त्यांना तसेच भोगावे लागले आहेत हे देखील सर्वांच्या समोरच आहे.आजच्या पाठिंब्यामुळे भविष्यात जर भाजपाची सत्ता आली तर मेटेच्या मंत्री पदावर शिक्का मोर्तब होईल,का भाजप त्यांना धक्का देत त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह आणेल?

बीड लोकसभा मतदारसंघात बीड तालुक्यापुरत पाहिलं तर पंकजा मुंडे गटापेक्षा मेटे यांच्याकडे राजकीय पावर कमीच आहे.त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी चे उमेदवार निवडून येतील याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही.नुकताच राष्ट्रवादीचे आमदार असलेले जयदत्त क्षिरसागर यांनी आपली सर्व ताकद पंकजा मुंडे गटाच्या उमेदवार डॉ प्रितम मुंडे यांच्या विजयासाठी पणाला लावली आहे.त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. मुख्यमंत्री मेटेंच्या निर्णयाला गांभीर्याने घेतील का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दरम्यान,२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मेटेंचा बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी पराभव केला होता. यानंतर भाजपने मेटेंचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषदेवर नेलेलं होतं. पण आपल्याला मंत्रीपद मिळायलाच हवं यावर विनायक मेटे ठाम होते.परंतु ते त्यांना मिळवणे शक्य झाले नाही.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.