पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणशेतीविषयक

जिल्ह्याला शेतकऱ्यांसाठी विम्याचे कवच मिळाले, श्रेय कोणाचे असो ? – कॉ.महादेव नागरगोजे

पाटोदा:शेख महेशर― गेल्या दोन दिवसापुर्वी बीड जिल्हयातील शेतकऱ्याला अॅग्रीकल्चर इंन्सुरन्स कंपनीला शेतकऱ्याचा रब्बी सन २०२० चा पिकविमा भरुन घेण्यास आदेशित केले. त्या बाबत संबधिताचे आभारही मानले . परंतु खेदजनक बाब अशी की, पिकविमा कोणामुळे मिळाला यांचे श्रेय कोणी घ्यायचे या चर्चेला बीड जिल्हयात उधान आलेले आहे. यात विशेष म्हणजे शेतकऱ्याला पिक विम्याचे कवच मिळाले यातच जिल्हयातील शेतकरी समाधानी आहे. श्रेयाच देण्या घेण्याचे त्यास पडलेले नाही. असे सुतोवाचन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ.महादेव नागरगोजे यांनी केले. मी किसान सभेचा कार्यकर्ता या नात्याने आपणास विचारु इच्छितो की, आपण २ जुलै २०२० च्या रब्बी पिकविमा कंपनीच्या आदेशाची व श्रेयाची चर्चा केली असती तर थोडे बरे वाटले आसते ? असो आपण बीड जिल्हयातील शेतकऱ्याला सन २०२० च्या खरीप पिकविमा कंपनीला २ जुलै पुर्वी आदेशित केले नव्हते त्याचे कारण म्हणजे , जिल्हयातील पिक विम्यामधील बोगसगिरीमुळे विमा कंपनी विमा भरुन घेण्यास तयार झाल्या नाहीत. याला कारणीभुत जिल्हयातील गरीब व सर्वसामान्य शेतकरी दोषी आहे काय ? यावर श्रेयासाठी कोणीच काही केलेले नाही. त्याची आपण माध्यमाशी चर्चा पण घडवुन आणलीनाही . यातली एक बाब अशी आहे की, सन २०१९ च्या खरीप पिक विम्यातुन तुर, कांदा, कापसु व इतर पिकाना जिल्हयातील शेतकऱ्यांना आजुन पर्यंत पिक विमा मिळालेला नाही. दुसरी एक अतीमहत्वाची बाब अशी आहे की , सन २०१९ च्या रब्बी पीक विम्यासाठी पाटोदा तालुक्यासहीत जिल्हयातील बऱ्याचशा तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१९ चा रब्बी पिकविमा भरुन घेण्यास त्या वेळच्या सरकारने कोणत्याच विमा कंपनीला आदेशित पण केले नव्हते. तसे कोणी प्रयत्न केल्याचे ऐकवित नाही. आज ही शेतकऱ्यांना बी – बियाणे कंपनने शेतकऱ्यांना सोयाबीनचे खोटे बियाणेदेऊन शेतकऱ्याची फसवणुक केलेली असुन त्याला देशोधडीला लावलेले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे . त्याच्या भरपाईचे काय ? संपुर्ण देशात महागाईचसा आगडोंब उसळला आहे . त्यामुळे देशातील सर्वसामान्य व गरीब माणसे उपासमारीने मृत्यूमुखी पडत आहे. आणि त्यातली त्यात महाराष्ट्र आणि संपुर्णभारत कोरोना व्हायरसची लागण होऊन लाखो लोक बळी पडत असुन दर दिवस हजारो लोक मृत्यूमुखी पडत असुन यात केंद्र व राज्य सरकार संपुर्णतः अपयशी ठरलेले आहे. यावर कोणीच कांही बोलत नसुन देशातील विरोधी पक्ष वरील प्रश्नावर चिडीचुप असुन या देशात भारतीय कम्युनिष्ट पक्ष वगळता एकही विरोधीपक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करत नाही. असो श्रेय कोणीही घ्या पण देशातील व राज्यातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी शेत मजुरासाठी रस्त्यावर आंदोलने करुयात-असो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button