जरंडी दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कर्जाचा डोक्यावरील असह्य झालेला डोंगर,त्यातच
खरिपाच्या हंगामात पावसाची दडी व आजाराने त्रस्त असलेल्या
तरुण शेतकऱ्याने रविवारी शेतातच विष प्रश्न केल्याची घटना रविवारी घोसला ता.सोयगाव येथे सायंकाळी घडली.या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला आहे.याप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यातआली आहे.तालुक्यात सलग हि तिसऱ्या शेतकर्याची आत्महत्या असून ४८ तासातच घोसला येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले असल्याची दुर्दैवी घटना घडली.
सोपान संपत बोरसे(रा.घोसला ता.सोयगाव वय ४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्याचे नावावर घोसला शिवारात १ हेक्टर जमीन असून त्याचेकडे तब्बल पाच लाखाचे कर्ज असून त्याला गंभीर आजारानेही छळले असल्याने या शेतकऱ्याने कर्ज फेडावे कि उपचार करावे तसेच खरिपाच्या हंगामाची चिंताजनक असलेली स्थिती पाहून शेतातच विष प्राशन करून कर्जाच्या चिंतेने आत्महत्या केली.तातडीने उपचारासाठी या शेतकऱ्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान एकीकडे सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झालेले असतांना प्रशासनाचे मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष झाल्याचे आढळून येत आहे.तब्बल ४८ तासात ३ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मृत्यूला मिठी मारली आहे.मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
0