पाटोदा:नानासाहेब डिडुळ― बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा पुलावरील संरक्षक पाईप नसल्याने वाहतुकीस घोका निर्माण झाला असुन वाहन धारकांच्या जिवास जिवित हानी व जनावरे देखील नदीत पडु शकतात. त्यामुळे संरक्षक पाईप बसवुन नागरिकांची सोय करावी. व चुंबळी फाटा ते सौताडा रस्त्यावरील खड्यामुळ वाहनधारकांना अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने खडे बुजवण्यात यावेत ८ दिवसात हा प्रश्न मार्गी लावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पाटोदा यांच्या वतीने लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल व सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील या मागणीचे निवेदन तालुका अध्यक्ष रामदास भाकरे संभाजी बिग्रेड यांनी दिले आहे.
0