राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.११ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.

नांदेड- १, गडचिरोली- १, अमरावती -१, भंडारा-१, वर्धा – १ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) एकूण पाच तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २३३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

ज्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सायंकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.