जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने गुरुवारी जरंडी (ता.सोयगाव) येथे ग्रामपंचायत आवारात सरदार वल्लभभाई यांना सरपंच समाधान तायडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी साहित्यिक अपूर्व राजपूत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्याख्यानात त्यांनी सांगितले कि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटणारा एकमेव शेतकरी नेता म्हणून सरदार वल्लभभाई यांची इतिहासात ओळख आहे.परंतु शालेय अभ्यासक्रमात मात्र लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या बाबत सखोल मांडणी करण्यात आली नसल्याची खंत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जरंडी चौकाचे सरदार वल्लभभाई चौक नामकरण करण्यात येवून फलकाचे अनावरण नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी,सरपंच समाधान तायडे,विजय कारगिल,शेतीनिष्ठ शेतकरी रवींद्र पाटील राजेंद्र पाटील,राजेंद्र चौधरी,ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील,अजय राजपूत,लोटन पाटील,युवा मित्र मंडळाचे प्रीतेश चौधरी,हर्शल पाटील,भूषण चौधरी,मंदार चौधरी आदींची उपस्थिती होती.
0