शहादा:आठवडा विशेष टीम―भाजीपाल्याच्या आडत दुकानांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून २००५ पासून केलेली मागणी दुर्लक्षित झाल्याने भाजीपाला दुकानदार संघटनेच्यावतीने वेमुदत वंदची घोषणा करण्यात आल्याचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले. पालिका, कृपी उत्पन्न वाजार समिती, आणि नेते यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न रेंगाळत असल्याचा आरोप देखील संघटनेच्यावतीने करण्यात आला.यामुळे येत्या काही दिवसात शहादे करांना भाजीपाला मुकावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे गेल्या दोन दिवसानंतर शहरात चांगला भाजीपाला मिळत नसल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे तातडीने या प्रश्नाकडे प्रशासन आणि पदाधिका-यांनी लक्ष देऊन सोडवणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे.याबाबत सविस्तर असे की शहादा शहरातील मध्यवर्ती भाजी मंडई आणि त्याला लागून असलेली आडत दुकाने कोरोना कंटेनमेंट झोन मध्ये आल्याने सध्या त्या ठिकाणी भाजीपाल्याचा लिलाव प्रशासनाने थांबवलेला आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून शहादा शहराच्या वळण रस्त्यावर काही जणांनी दुकाने घेऊन व्यवस्था केली आहे. मात्र इतरांना अजूनही जागा उपलब्ध न झाल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांना देखील येणे जाणे जिकरीचे झाले आहे. ही व्यवस्था कोलमडलेली आहे.तुर्तास कृपी उत्पन्न वाजार समितीच्या आवारामध्ये यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी पुढे करण्यात आली आहे.२००५ साली सहकारमहर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या उपस्थितीत भाजीपाला आडत दुकान साठी भूमिपूजन आणि कोनशिला देखील लावण्यात आली होती. मात्र त्यावेळी आर्थिक तडजोड न झाल्याने हा प्रस्ताव वारगळला. दरम्यान आताची परिस्थिती ओढवल्याने संघटनेने याच मागणीचा पाठपुरावा केला आहे सोवतच पालिकेला देखील यासंदर्भात व्यवस्था करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.जिल्ह्यात आणि राज्यात सर्वदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच भाजीपाला आणि मंडळी व्यवस्था होत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले मात्र शहादा कृपी उत्पन्न वाजार समितीत केवळ आणि केवळ भुसार मान विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध असल्याचे खंडू वच्छाव यांनी स्पष्ट केले तर या ठिकाणीच लाकूड व्यापाऱ्यांना जागा देत भाजीपाला व्यवसायिकांना आणि व्यवसायिकांना दूर ठेवले जात असल्याचाही आरोप संघटनेचे विनायक पवार यांनी केला आहे दुकानदार संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष हाजी युसुफ दिलावर मंसुरी,कैलास किसन चौधरी, सतिप पंडितराव महाजन, भरत मधुकर दुरंगी, दीपक दामोदर पाटील, वसंतराव भीमराव पाटील, राज मधुकर दुरंगी,हाजी हारून शेख अहमद वागवान, भिका नत्थू चौधरी,प्रकाश प्रभाकर चौधरी, विनायक निंवा पवार ,जालंदर धर्मा पाटील यांनी विविध पैलूंवर पत्रपरिपदेत माहिती दिली.दरम्यान पालिका प्रशासन आणि नेतृत्व ,तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नेतृत्व यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणात दाद मागणार असल्याचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी संघटनेच्या वतीने स्पष्ट केले.
0