परळी:आठवडा विशेष टीम―राजकारणाच्या पलीकडे जावुन समाजकारणाचा वसा जपन्यासाठी मनाच्या मोठेपनासह साहसही लगाते.अंतरमन आणि बाह्यरूप यात किंचितही तफावत नसनारे खुप कमी असतात.एरवी राजकरणाच्या भूमिकेत असलेले निवडणुका नंतर लगेच 100 % समाजकारणाच्या रुपात स्वतःला रूपांतरित करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी आणि शहर सरचिटणीस अनंत इंगळे हे दोन जिगरबाज चेहरे स्वतःची परवा न करता सामाजिक बंधीलकी म्हणून ना.धनंजयजी मुंडे साहेबांचे ग्राउंड जीरोवर फ्रंट लाइन मध्ये कार्य करणारे वॉरियर्स म्हणून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
कोरोना सारख्या जीवघेन्या संसर्गजन्य अजाराची पर्वा न करता बाजीराव भैया धर्माधिकारी आणि अनंत इंगळे या जोडिनी लॉक डाउनच्या पहिल्या दिवसा पासुन ते अत्तापर्यंत समाजाच्या प्रत्येक गरजू घटका पर्यंत विविध योजना,उपक्रम,योग्य ती मदत पोहंचविन्याचे कार्य केले आहे ज्या मध्ये गराजुसाठी धान्य किट,विविध संस्थेला सैनीटाइज़र,उपचारासाठी मदत,वृक्षाचे संगोपन,आणि सध्या राज्यभर गाजलेले पुस्तक रथ याचा समावेश आहे.
ग्राउंड जीरो
जीवन मरण हे कालचक्राची एक आरी आहे आणि आज जो तो जीवाच्या भिति पोटी स्वतःला सुरक्षित ठेवन्याचा प्रयत्न करीत आहे(आणि करायलाही हवे) परंतु जेव्हा पाठीवर जबाबदारीचे ओझे आणि कर्तव्याची जान असते तेव्हा अंगात बळ असन्या पेक्षा आत्मबळ प्रबळ असावे लागते आणि अशा परिस्थितीत स्व-सुरक्षेसह वंचित,गरीब,गरजू आणि अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्ति पर्यंत मदतीचा हात पोहंचने गरजेचे गरजेचे असते आणि हेच कार्य ना.धनंजयजी मुंडे सहेबांचे ग्राउंड जीरोवर फ्रंट लाइन मध्ये कार्य करणारे वॉरियर्स म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी आणि शहर सरचिटणीस अनंत इंगळे हे दोन जिगरबाज चेहरे स्वतःची परवा न करता सामाजिक बंधीलकी म्हणून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
संकटकाळी जो समोर ऊभा असेंन तोच गराजवंताचा विठ्ठल आणि मनाची श्रीमंती असनारच कुबेर.
शब्दांकन
अँड.मनजीत सुगरे
परळी वैजनाथ