यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ‘मानवाधिकार संरक्षणात शासनाची भूमिका’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :एक मानव म्हणून मानवअधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. सुशासनात जोपर्यंत आपली प्रत्येकाची भागीदारी वाढणार नाही.तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. मानवअधिकारांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आपला सहभाग वाढवला पाहिजे,त्यात आपली काय भूमिका आहे. त्यानुसार प्रत्येकाने हक्कांची जाणीव ठेवून जबाबदारी ओळखावी असे प्रतिपादन डॉ.बालगौडा पाटील (कर्नाटक) यांनी राष्ट्रीय चर्चासत्राच्या बीज भाषणात केले.
येथील म.शि.प्र. मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवाधिकार संरक्षणात शासनाची भूमिका” या विषयांवर एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सोमवार,दि.18 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आले होते.प्रारंभी पुलवामा येथील शहीदांना सभागृहाने अभिवादन केले.लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य डॉ.नरेंद्र काळे हे होते तर उद्घाटक म्हणून पिपल्स कॉलेज नांदेडचे प्राचार्य व्ही.एन.इंगोले तसेच बीजभाषक म्हणून डॉ.बालगौडा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोजकुमार नवासे (मानव अधिकार संघटना उपाध्यक्ष बीड जिल्हा),प्राचार्य अघाव, मुख्य संयोजिका प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजिका प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी यांनी केले.पहिल्या सत्रात या राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध अभ्यासक व संशोधक प्रा.बालगौडा पाटील यांनी केले.तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, बीड येथील उपाध्यक्ष मनोजकुमार नवासे यांनी आपले मौलीक विचार मांडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून खर्या अर्थाने मानव अधिकारास सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगुन कोणतीही क्रांती अधिक डोक्यात घडते.त्यानंतर ती रस्त्यावर येते व बदल घडविते असे नवासे म्हणाले.चर्चासत्राचे उद्घाटक प्राचार्य व्ही.एम.इंगोले यांनी पोलिसांची भूमिका रक्षकाची की भक्षकाची असा सवाल करून देशात सुमारे 35 लाख स्त्रियांना वेश्या व्यवसायात आणल्या गेल्याचे सांगुन कायद्याने न वागल्याने माणसे हिंसा करतात. अधिकारांची पुर्ती झाली तरी आपण यशस्वी झालोत.देणारा हा दायित्वाची भूमिका निभावतो.मानव अधिकार सुरक्षेसाठी शासनाची भूमिका महत्वाची असल्याची माहिती प्राचार्य व्ही.एम.इंगोले यांनी दिली.दुसर्या सत्रात पेपर वाचन झाले यात डॉ.विशाल पतंगे (विषय-मानवी हक्क व प्रसार माध्यमे ), डॉ.रमेश सोनवळकर (विषय-भारतातील मानवी अधिकार व सामाजिक लोकशाहीची भूमिका),डॉ.भारती कांबळे (विषय-भारतीय संविधान व मानव अधिकारी), डॉ.एस.जी.दिवाण (विषय-मानवी अधिकारी व भारतीय राज्यघटना), प्रा.डॉ.वैशाली आहेर (विषय- ह्युमन राईट्स इन इंडियन काँन्स्टीट्यूशन अ ब्रीफ रिव्हूव),डॉ.थारकर (विषय- मानवी हक्क आयोग),डॉ.संजय सोळंके (विषय-द-रोल ऑफ दी गव्हर्नमेंट्स फुड द ह्युमन बिईंग) तसेच सागर कुलकर्णी यांनीही यावेळी पेपरचे वाचन केले.या प्रसंगी डॉ.नवनाथ आघाव यांनी प्रगत राष्ट्र व मानवी हक्क यांच्यातील परस्पर संबंध या विषयी मौलीक चिंतन मांडले. या सत्राचे अध्यक्ष आर.के.काळे हे होते. यावेळी प्रा.अनंत मरकाळे यांनी या सत्रात आभार प्रदर्शन केले.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.एस.के.जोगदंड हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.भूषणकुमार जोरगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या सत्रात महिला व त्यांचे हक्क,शेतकरी,शिक्षक, विद्यार्थी,पालक यांचे अधिकार आणि हक्क तसेच मानवी अधिकाराची पार्श्वभूमी या विषयी डॉ.भुषणकुमार जोरगुलवार यांनी महत्वपुर्ण माहिती दिली.मानवी अधिकार व्यवहारात कसा अंमलात आणावा,हल्ली मानवी अधिकारांचा वापर वाईट कामांसाठी काही माणसे करत असल्याचे जोरगुलवार यांनी नमुद केले.समारोप सत्राचे आभार प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी मानले.या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी बीड जिल्ह्यातील सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांनी, संशोधकांनी सक्रीय सहभाग नोंदवला.राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे यावेळी मान्यवरांनी विमोचन केले.राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या व चर्चासत्राच्या मुख्य संयोजक डॉ.वनमाला गुंडरे तसेच चर्चासत्राचे सह-समन्वयक डॉ.दिनकर तांदळे,डॉ.डी.बी. तांदुळजेकर,डॉ.ए.बी.
बरूरे यांच्या सहीत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,कर्मचारीवृंद,संशोधक,विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.