प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८३ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.१६ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ६२९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ५४९  पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १५ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१३ (८७९ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार १९४

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४४

जप्त केलेली वाहने – ९२ हजार ०७६.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८२

(मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५,  ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ जालना ग्रामीण १, अमरावती शहर १,  उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी १ पोलीस, औरंगाबाद शहर-१)

कोरोनाबाधित पोलीस – १५८ पोलीस अधिकारी व ११२३ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button