पाटोदा ( प्रतिनिधी) सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे युवकांनी चांगला अभ्यास करून व्यसनमुक्त होऊन चांगला युवक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विचार सौ सुनंदा जावळे यांनी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भिमनगर पाटोदा येथे व्यक्त केले.
पुढे बोलताना सौ. सुनंदा जावळे म्हणाल्या की युवकांनी चांगला अभ्यास करून चांगले यश संपादन केले पाहिजे. जो शिकेल तोच स्पर्धेत टिकेल, या साठी युवकांनी वाईट व्यसन न करता चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस भगवान जावळे व दे.मा.जावळे (गुरुजी) यांच्या हस्ते तर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला रमेश जावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी संदीप जावळे, भगवान जावळे यांची समयोचित भाषणे झाली. या वेळी संगीता जावळे, रमा जावळे, शीला जावळे, बेबी जावळे, अश्विनी जावळे, कमल जावळे, पुनम औसरमल, साक्षी जावळे, स्नेहा जावळे, प्रज्ञा जावळे, सोनाली जावळे, अम्रपाली जावळे यांच्या सह नितीन जावळे, संजय जावळे, रमेश जावळे, विशाल जावळे, जयदीप जावळे, दिक्षांत जावळे, चेतन जावळे यांच्या सह महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पुलवामा येथील हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी विनिता रमेश जावळे यांच्याकडून खीर दान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार संदीप जावळे यांनी मानले.
0