सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― महिनाभरापासून मंडळ सज्जेचा दर्जा प्राप्त जरंडी तलाठी सज्जेला तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची मोठी परवड झाली आहे.सोयगावला जावूनही तलाठ्याचा पर्यायी शोध होत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
कोरोना संसर्गात आणि ऐन अतिवृष्टीच्या कालावधीत या परिस्थितीने तलाठ्याअभावी शेतकऱ्यांना मोठी फजित व्हावे लागत असून तलाठी सज्जेला महिनाभरापासून कामे ठप्प झाली आहे.शेतकऱ्यांना ऐन अतिवृष्टीच्या पिकांच्या नुकसानीच्या माहिती आणि लेखी अर्ज देण्यासाठी तलाठी उपलब्ध नाही त्यामुळे सोयगाव तहसील कार्यालयाला जावून या नुकसानीची माहिती द्यावी लागत आहे.त्यातच परिसरात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी व उपचारासाठी जरंडीला शासनाचे कोविड केंद्र आहे.या कोविड केंद्रावर तलाठ्याअभावी इतर सुविधा उपलब्ध होत नाही.तलाठीच नसल्याने कोविड केंद्रातील सुविधाची गैरसोय झाली असून रुग्णांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाही.जरंडी सज्जेला नुकताच मंडळ सज्जेचा दर्जा प्राप्त झाला आहे.प्रभारी मंडळ अधिकाऱ्यावर असलेल्या या सज्जेला तलाठीच उपलब्ध नाही.जरंडी,धिंगापूर,रावेरी,या तीन गावांच्या महसुली क्षेत्र असलेल्या या सज्जेला तलाठ्याअभावी राहावे लागत आहे.शेतकऱ्यांना शेती विषयक कामांना मात्र पूर्णविराम द्यावा लागला आहे.
आमखेडा विभाजनात जरंडीचे विभाजन-
आमखेडा येथे नवीन निर्मित झालेल्या तलाठी सज्जेला जरंडी साज्जेचे विभाजन करून नव्याने आमखेडा तलाठी सज्जा निर्मित करण्यात आली आहे.त्यामुळे जरंडी तलाठी सज्जाचे महसुली क्षेत्र कमी असूनही तलाठ्याविना आहे.