नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्दिजय सिंह यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना 'दुर्घटना' असा शब्द वापरलाय. तसंच त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या बालाकोट भागात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्हही उपस्थित केल आहे. त्यावर माजी सेना प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी दिग्विजय सिंह यांना चांगलंच फटकारलंय.
'पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुसेनेन केलेल्या हवाई हल्ल्यावर परदेशी मीडियाकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे' असं ट्विट दिग्दिवज सिंह यांनी केलं.
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike" के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019
यावर, दिग्विजय सिंह यांना प्रत्यूत्तर देताना जनरल (रिटायर्ड) व्ही के सिंह यांनी 'जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला ही घटना दुर्घटना होती की हल्ला'... इथवरचं ते थांबले नाहीत तर त्यांनी 'राजीव गांधींची हत्या, दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचं उत्तर मला दिग्विजय सिंग यांनी द्यावं बाकीच्या गोष्टी नंतर बोलू' असं म्हणत दिग्विजय सिंह यांना अडचणीत आणले आहे.
#WATCH Union minister VK Singh on Congress leader Digvijaya Singh terming #Pulwama terrorist attack an “accident”,says, "With due respect, I would like to ask Digvijaya Singh Ji, was Rajiv Gandhi's assassination an accident or a terror incident?" pic.twitter.com/Sm1blc2Gjj
— ANI (@ANI) March 5, 2019