अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शहरात साहित्यिक सखी ग्रुपकडून अंबाजोगाईत आयोजित कार्यक्रमात एकाचवेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिध्द गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कोरोना सारख्या संकटात साहित्यिकांची लेखणी आणि मनाचे मनोरे फुलले,याचा परिणाम म्हणजे साहित्यिक सखी ग्रुप स्थापन करून आपल्या साहित्य लेखणीतुन ९ पुस्तके तयार केली.उदगीर येथील साहित्यिक सखी ग्रुपने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून एकाच वेळी ९ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध कवी प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.यावेळेस बोलताना गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे म्हणाले की,महिलांच्या लिहित्या हाताला बळ आणि प्रोत्साहन देण्यासाठी महिला साहित्यिकांचा ग्रुप ही अभिनव कल्पना या क्षेत्रात ऐतिहासिक असून या ग्रुपमधील कर्तुत्ववान महिलांनी आपल्या भावना आणि विचार कविता कथा अति लघु कथा चारोळी अशा साहित्य प्रकार मधून व्यक्त केलेले आहेत. ‘कोष’-अश्विनी महेश निवर्गी,-सौ अर्चना गोपाळकृष्ण नळगिरकर, ‘काव्यतुरा’-सौ मंजरी प्रसन्न मार्लेगावकर, ”- अश्विनी महेश निवर्गी, ‘-अश्विनी महेश निवर्गी, ‘मला मी भेटले नव्याने’-सौ क्षमा वाखारकर, ‘ओंजळ कवितांची- भाग एक’, ‘ओंजळ कवितांची भाग-दोन’,आणि ‘तिच्या लेखणीतून’ ही तीन पुस्तके – सौ अश्विनी महेश निवर्गी, सौ अर्चना गोपाळकृष्ण नळगिरकर, सुनंदा अशोक सरदार, प्रा. सौ अश्विनी संजय देशमुख या चार कवयत्री आणि कथाकार महिलांनी संपादित केली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोनशे महिला या साहित्यिक ग्रुपमध्ये सहभागी झाल्या असून सातत्याने वाचन, लेखन, चिंतन, मनन आणि प्रगटीकरण या भाव- अवस्थेतून जात आहेत. या सकस आणि सुंदर समुदायाचा परिणाम म्हणून ही साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी या सर्व महिला कौटुंबिक कामगिरी सांभाळत असताना करत असल्याचे पाहून मनस्वी आनंद होतो आहे. कविता आणि कथेच्या माध्यमातून त्यांनी जगण्याला सुचवलेल्या नवनव्या वाटा विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. वाचकांनी या नवीन वाटांचा निश्चितपणे विचार करायला हवा. या सर्व महिलांच्या साहित्यिक समुदायाच्या सातत्यपूर्वक उपक्रमशील तिला मनःपूर्वक या लिहित्या हातांचा आपल्याला आभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
उदगीर येथील साहित्यिक महिला ग्रुपच्या लेखिकांनी संपादित केलेल्या ९ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अंबाजोगाईत मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांच्या निवासस्थानी नुकताच आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय अक्षय सागर हे होते. तर यावेळेस ग्रुपच्या आयोजक आश्विनी निवर्गी,अर्चना नळगीरकर,सुनंदा सरदार,प्रा.अश्विनी देशमुख,उषाताई तोंडचिरकर यांच्यासह अपर्णा कुलकर्णी,नवोदित लेखिका कु.सायली संजय,श्रीमती उषाताई,मेजर एस.पी.कुलकर्णी,पुजा कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.साहित्यिक सखी ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येऊन आश्विनी निवर्गी,मंजिरी मार्लेगावकर,शमा वाखरकर आदींच्या सहभागातून कथा,कवितासंग्रह,लघुकथा,ई-बुक्स अशा विविध साहित्य प्रकाराच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.उषाताई तोंडचिरकर यांनी स्वागतगीत सादर केले.याप्रसंगी आश्विनी निवर्गी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वलिखित तीन पुस्तकांचा प्रवास कसा झाला ? हे अनुभव विषद केले,तर मंजिरी मार्लेगावकर यांनी कविता व गझल सादर केल्या,नवोदित लेखिका कु.सायली कुलकर्णी,पुष्पा चपळगावकर आणि मेजर एस.पी.कुलकर्णी यांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय समारोप करताना विजया क्षीरसागर म्हणाल्या की,साहित्यिक क्षेत्रात लेखकांनी आपल्यातल्या सद्गुणांचा वापर करत ग्रुपच्या माध्यमातून कोरोना सारख्या संकटात बहरलेल्या लेखणीचा फुलोरा वाचकांच्यासाठी खुला केला याचा मनस्वी आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.”सखी ग्रुप” म्हणजे महिलांनी महिलांसाठी तयार केलेले महिलांचे व्यासपीठ आहे.कुटुंब आणि संसाराची जबाबदारी सांभाळत महिलांची आनंदाची मानसिकता आणि चळवळ या उपक्रमातून निर्माण होते.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा पांडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अपर्णा कुलकर्णी यांनी मानले.यावेळी डॉ.महेश निवर्गी,गोपाळकृष्ण नळगीरकर,प्रसन्न मार्लेगावकर,भूषण क्षीरसागर,अर्चना अन्सरवाडकर,प्रेम सागर आदींसह लेखिकांची उपस्थिती होती.ज्येष्ठ महिला उषा कुलकर्णी यांनी स्वरचित कवितेचे वाचन करून आपल्या उद्बोधक रचना सादर केल्या.तर गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांनी आपल्या प्रसिद्ध गझलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.एकाच वेळी ९ पुस्तकांचे प्रकाशन होणे ही साहित्यिकांसाठी पर्वणीच असून कोरोना सारख्या संकटात मागील दीड वर्षात असा कार्यक्रम शहरात झाला नाही. हा उल्लेख डॉ.राजपंखे यांनी आवर्जुन केला.उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सखी ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या सर्व लेखिकांचे आणि त्यांच्या भूमिकांचे गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांनी मनापासून स्वागत केले.तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात कविता,गझल व लघुकथा यांचे आनंददायी वातावरणात सादरीकरण करण्यात आले.