अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घ्यावे असे आवाहन केले.
येथील न्यु ॲपल ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन यशाचा नवा पायंडा पाडला असून या वर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करून जिशान उस्मानी या विद्यार्थ्याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.सर्व विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उर्त्तीण झाले आहेत.शाळेचा निकाल शंभर टक्के एवढा लागला आहे.न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजची यावर्षीची पहिलीच बॅच होती.गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी हे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस.बी.सय्यद,मार्गदर्शक प्रा.एस.एस.धुळे,सामाजिक कार्यकर्ते मुजीब काझी,डॉ.मीर आरेफ अली उस्मानी,डॉ.सीरत फातेमा उस्मानी,शाळेच्या प्राचार्या एम.एम.सय्यद आदींची उपस्थिती होती.प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.गुणगौरव प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.मीर आरेफ अली उस्मानी,डॉ.सीरत फातेमा उस्मानी यांनी विशेष मार्गदर्शन केले.तर यावेळेस बोलताना एस.बी.सय्यद म्हणाले की,आम्ही केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की,मुस्लिम समाजात शैक्षणिक मागासलेपण मोठ्या प्रमाणावर आहे,याचे प्रमुख कारण हे मुस्लिम समाजाच्या आर्थिक मागासलेपणात दडले आहे असे सय्यद म्हणाले.तर प्रा.एस.एस.धुळे यांनी यावेळेस बोलताना न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजला गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले,यावेळेस मुजीब काझी यांनी ही उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक करताना मीर तारेख अली उस्मानी म्हणाले की,आज आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जाणार आहोत.शिक्षण घेताना आपल्या मनात ध्येय व जिद्द असली पाहिजे,आपल्याकडे सर्वगुण संपन्नता पाहिजे.न्यु ॲपल ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे मीर तारेख अली उस्मानी म्हणाले.अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मीर फरकुंद अली उस्मानी यांनी विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला.कार्यक्रमाचे सुञसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.सय्यद हसन गफूर यांनी मानले.या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मलेका शेख खालेक,प्रा.सिद्दिकी किरतऐन,प्रा.मेहरून्निसा मुशर्रफ हाश्मी
यांनी विशेष परिश्रम घेतले.