अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेने गतवर्षीपासून पर्यावरणपूरक अशा गोमय गणेशमूर्ती आणि यावर्षी प्रथमच रक्षाबंधनासाठी आकर्षक अशा वैदिक राख्या तयार केल्या आहेत.यातून पर्यावरण संवर्धन करण्याचा मौलिक संदेश देण्यात आला आहे.अशी माहिती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळेचे प्रमुख ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी दिली आहे.
मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगासमोर कोरोना या संसर्गजन्य रोगराईचे मोठे संकट उभे टाकले आहे.अशा परिस्थितीत आपण अतिशय साध्या पद्धतीने आपले प्रत्येक सण साजरे करीत आहोत.त्याच प्रमाणे यावर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव ही अतिशय साधेपणाने आणि शासनाने कोविड पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन करीत साजरा करूया.घरच्या घरी कुंडीमध्ये श्रींचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धन करूया.कारण,मानवी जीवनात आपण नकळत किंवा अजाणतेपणामुळे निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे काम करीत आहोत.या बाबींचा विचार करून राष्ट्रीय कामधेनू आयोग,भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी व गो-सेवा गतीविधी,देवगिरी प्रांत यांच्या विधायक सूचनांप्रमाणे तसेच गो-शाळेतील गायींचे संगोपनासाठी गो-शाळा स्वावलंबी बनणे गरजेचे आहे.देश-देव अन् धर्मासाठी गो-आधारीत विविध जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करून गो-शाळा स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.याच विचाराला बळ देण्यासाठी गतवर्षीपासून पर्यावरणपूरक आणि आकर्षक अशा “गो-मय गणेशमूर्ती” तयार केल्या,पर्यावरणाची हानी तसेच जल प्रदूषण ही होणार नाही.तसेच जीव दया ही होईल.या विधायक उद्देशाने आम्ही गो-मय गणेशमूर्ती सोबत एक कुंडी व वनौषधींचे-बी आणि भाजीपाल्याचे-बी देण्यात आले.या “गो-मय गणेशमूर्तींना” गणेश भक्तांकडून गतवर्षी भरभरून प्रतिसाद मिळाला.अनेकांकडून रक्षाबंधनासाठी गोमय ‘वैदिक राखी’ मिळेल का अशी विचारणा ही करण्यात आली होती.त्यानुसार यावर्षी प्रथमच गोमय वैदिक राखी तयार केली आहे.तरी ज्या गणेश भक्तांना पर्यावरणपूरक “श्री मूर्ती” आणि पर्यावरणपुरक आकर्षक वैदिक राख्या हव्या आहेत.त्यांनी कृपया ॲड.अशोक बालासाहेब मुंडे, प्रमुख-लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे गोरक्षण शाळा वरवटी,ता.अंबाजोगाई,जि.बीड,(संपर्क क्रमांक-9764185272/ 9284408407) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.नुकतेच पुणे येथे रोटरी क्लब कर्वे नगर व जनमित्र सेवा संघ यांच्या वतीने आयोजित समाजभूषण सोहळ्यात गोआधारीत उत्पादन बनविणे,तुळस लागवडीसाठी केलेले कार्य तसेच गाईच्या शेणापासून केलेल्या वैदिक राख्या पाहून पद्मश्री पांडवजी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, एअर मार्शल भुषण गोखले,रोटरीचे डॉ.परमार,जनमित्र सेवा संघाचे अध्यक्ष ॲड.माऊली तुपे पाटील,डॉ.कुलकर्णी या मान्यवरांकडून लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेचा केला विशेष गौरव केला हा सन्मान ॲड.अशोक बालासाहेब मुंडे यांनी स्विकारला.याबाबत माहिती देताना ॲड.मुंडे म्हणाले की,४ वर्षापूर्वी जेव्हा गोशाळा सुरू केली होती तेव्हा केवळ १ गाय होती.तिथे आज ७२ गोवंश असून या गोशाळेला स्वावलंबी बनविण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गाय व तुळस आवश्यक आहेत म्हणून जवळपास ३० प्रकारचे गोआधारीत उत्पादने तयार करून निरोगी व सदृढ आरोग्य कसे राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत,कोरोना सारख्या महामारीत आपल्याला अनेक अडचणींना समोरे जावे लागले म्हणून गोशाळेत यावर्षी प्रथमच शेण व माती यांच्या मिश्रणातून “गोमय वैदिक राख्या” तयार केल्या आहेत.यात विविध पाले व फळभाज्यांचे “बी” असून राखी पौर्णिमेनंतर वैदिक राखी कुंडीत टाकल्यास त्यातून मिळणारा भाजीपाला हा परिवाराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास ही मदत होईल.आमच्याकडे गोमय गणेशमूर्तीही उपलब्ध आहेत.यातून पर्यावरण व गोसंवर्धन महत्वाचे आहे हे जागरूक नागरिकांच्या लक्षात येईल आणि लोक “गोमय गणेशमूर्ती आणि गोमय वैदिक राखी” यांना पसंती देतील असा विश्वास ॲड.अशोक मुंडे यांनी व्यक्त केला आहे.