बीड जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी भारत देशाला आधुनिक तंत्रज्ञान बहाल केेले.सोबतच तरूणांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला.देश महासत्ता व्हावा अशी तरूणांना स्वप्ने देणार्या या पंतप्रधानांनी भारताला जागतिक स्तरावर नवी महाशक्ती म्हणुन पुढे आणले.कॉंग्रेस पक्ष आज त्यांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहे.तरूणांना अधिका-अधिक संधी देण्यात येत आहे.देशातील आठरा पगड जातीधर्माच्या लोकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष कटीबद्ध असल्याचे विचार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळेस व्यक्त केेले.बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
देशाचे दिवंगत पंतप्रधान दिवंगत राजीवजी गांधी यांना बीड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाईत सहकार भवन हॉल येथे शुक्रवार,दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी वरील विचार व्यक्त केेले.याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,भारत जोगदंड,दिनेश घोडके,सुनिल वाघाळकर,विशाल पोटभरे,सचिन जाधव,जुनेद सिद्दीकी,शाकेर काझी,प्रताप देवकर,अकबर पठाण,अमोल मिसाळ यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रारंभी दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून जिल्हा,तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी पदाधिकार्यांनी अभिवादन केेले.