कडा:शेख सिराज―
अधिच कोरोना सारख्या जागतीक महामारीने व निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे आष्टी तालुक्यात कांदा हे मुख्य पिक आहे. आता कांद्याला रासायनिक खते देण्याच्या वेळी खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ज्या ठिकाणी खते मिळतात तेथे चढ्या भावाने म्हणजे कंपनीच्या सुधारित भावापेक्षा २०० ते २५० रूपये किंमत जास्त मोजावी लागते. पक्या बीलाची मागणी केली तर खत शिल्लक नाही असे उत्तर येते ज्यांना वीस पंचवीस बॕग ठेवण्याचे परवाना आहे त्यांच्याकडे चारशे ते पाचशे बॕगेचा साठा आहे. हि परिस्थिती आष्टी तालुक्यात सर्रास दिसून येते यावर कुठंलही अधिकारी वर्गाचे वचक दिसून येत नाही.
रोज संध्याकाळी साडेसात वाजता टिव्हीवर आर सी एफ सुफला मुबलक प्रमाणात आहे अशी जाहिरात येते ती फक्त शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच..!
हि सर्व परिस्थिवर कृषी विभागाने लवकरात लवकर किंवा प्रशासकिय यंञणेने शेतकर्यावरील होणारा अन्याय व शेतकर्यांचे होत असलेले शोषण कुठल्याही परिस्थित थांबले पाहिजे.दोषी कृषी सेवा केंद्रावर तत्काळ दंडात्मककार्यवाही केली पाहिजे. तसेच क्रूषीसहाय्यक यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा मूख्यालयी राहुन काम पहावे याविषयी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री शेख आजमोद्दीन व सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी तालूका क्रूषी अधिकारी यांचेकडे फोनवर संवाद साधत तक्रार केली आहे त्यांना अशाप्रकारे कुणी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे परत तक्रार आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.