पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपचे डी. पी. वरील कनेक्शन तोडलेले असून अनेक गावात कनेक्शन तोडण्याचे काम चालू आहे. कनेक्शन तोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना सात दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तसे न करता अचानक कनेक्शन तोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांकडील जनावरे पिण्याच्या पाण्या अभावी तडफडत असून तालुक्यातील काही जनावरे पाण्या अभावी दगावले आहेत हा शेतकऱ्यावर घोर अन्याय असून एकदरित या तालुक्यातील शेतकऱ्यावर गेल्या दोन वर्षांपासून चे कोरोना संकटाला जिल्ह्यातील व तालु्यातील शेतकरी शेतमजूर उधवस्त होऊन देशोधडीला लागला. ह्या कोरोना संकटाला सावरण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेले असून पुन्हा तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने व ओमायक्रोन नावाच्या विषाणूची लागण या देशात होऊ लागलेली आहे आणि दुसरे असे की गेल्या सप्टेंबर -ऑक्टोंबर 2021 मध्ये अतिवृष्टीचा महकोप यात शेतकऱ्यांची पिके जमिनी सहित वाहून गेली, सडली, जनावरे मेली, मनुष्यहानी झाली तरी अद्याप पर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या पिकाच्या नुकसान भरपाई चे अनुदान मिळाले नसून जे अनुदान मिळाले ते अत्यंत तुटपुंजे असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे आणि वर पुन्हा या महावितरण कंपनीच्या आडमुठे पणामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी तिहेरी संकटात आलेले असताना शासनाने सहकार्य करणे ऐवजी सरकार व महावितरण कंपनी सूडाच्या भावनेने वागत असून आपण शेतकऱ्यांकडील थकित विज बिल माफ करून शेतकऱ्याचे वरील कनेक्शन डी,पि वरील त्वरित जोडून द्यावे अन्यथा खालील मागण्यावर गुरुवार दि.16/12/2021 रोजी ठीक 11 वाजता चुंबळी फाटा या ठिकाणी तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सहभाग करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मागण्या:-
1) शेतकऱ्यांच्या डी.पी वरील कनेक्शन त्वरित जोडण्यात येऊन शेतकऱ्याकडील थकित विज बिल माफ करावे.
2) शेतकऱ्यांना तोंडी किंवा लेखी सूचना न देता कनेक्शन तोडले त्या संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी.
3) तालुक्यातील उद्योग धंद्यावाली कारखानदार नेते अधिकारी यांच्याकडील थकित व वसुलीच्या वीज बिलाची यादी द्यावी.
4) वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याचाबचाव होण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. ( उदा. रानडुक्कर, बिबट्या, सर्पदंश, ई.)
5) विज महावितरणचे खाजगीकरण रद्द करून एम. एस. ई. बी. मार्फत वीज पुरवठा करावा.
7) महावितरण कंपनी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी गावातील दळणवळण व पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाही करण्यात यावी.
अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्रक
कॉ. महादेव नागरगोजे, भाई विष्णुपंत घोलप, डॉ. गणेश ढवळे, कॉ. भगवानराव जावळे, मोहन सोनवणे, ज्ञानोबा माऊली जगदाळे, आश्रू पवळ, राजेंद्र येवले, त्रिंबक पठाडे, कॉ. आत्माराम राख, कॉ. सुधाकर देवराव शिरसाठ, कॉ. विठ्ठल दादा पवळ, कॉ. दत्तू शिरसाट, कॉ.डॉ.लक्ष्मण विघ्ने, रमेश देशमाने, सखाराम पेचे, प्रल्हाद भोरे, कॉ. आशरफ भाई, कॉ. हसन बाबा, भागवत नागरे, गंगाराम तांबे, कॉ. अरुण येवले, कॉ.अतुल देवडे, कॉ.बबन हुळजुते, कॉ.श्रीरंग नागरगोजे, को.नामदेव नाईकवाडे, को.सुधाकर फाटे, कॉ.तात्या नागथई इत्यादींनी दिलेले आहे.