बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

महिलेशी असभ्य वर्तण प्रकरणात डाॅ.अशोक बांगर यांना निलंबित करण्यासाठी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन

बीड(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील नेकनुर कुटीर रूग्णालयातील महिलेशी असभ् य वर्तण करणा-या आयुष विभागातील डाॅ.अशोक बांगर यांच्यामुळे रूग्ण आणि कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पवित्र वैद्यकीय व्यावसायाची बदनामी करणा-या डाॅ.अशोक बांगर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अड.संगिता धसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दि.२१ फेब्रुवारी रोजी डाॅ.सुरेश साबळे यांना भेटून निवेदन देत आंदोलनाचा ईशारा दिला होता परंतु ४ दिवसात त्रिसदस्यीय समिती नेमुन ४ दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले होते परंतु ठोस कारवाई न झाल्याने अखेर आज दि.२५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात संजीवनी राऊत, अश्विनी झनझने, किस्किंदा पांचाळ, वर्षा कुलकर्णी, विद्या सेलुकर, शुभांगी कुलकर्णी, डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, स्वप्निल गलधर, युनुस शेख, मोहम्मद मोईज्जोदीन ,शेख मुबीन, परमेश्वर लोंढे,डाॅ.संजय तांदळे, श्रीकांत गदळे आदि सहभागी होते. आंदोलनस्थळी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आज चौकशी समितीची बैठक असून सोमवार पर्यंत ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

जिल्हाप्रशासनाला घटनेचे गांभीर्य नाही , चौकशी समितीचा निव्वळ फार्स –डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.अशोक बांगर यांनी महिलांशी असभ्य वर्तण करण्याची ही पहिलीच वेळ नसुन त्यांच्याविषयी यापुर्वीही तक्रारी आलेल्या असून कर्तव्यावर मद्यपान करण्यासहीत असभ्य वर्तणाची तक्रार २० दिवसापुर्वी प्राप्त होऊन सुद्धा राजकीय वरदहस्त असल्याने तसेच पिडीत महिला व वैद्यकीय आधिका-यांवर दडपण आणुन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न असून जिल्हाप्रशासनाला या विषयांचे गांभीर्य नसुन दि.२१ फेब्रुवारी रोजी त्रिसदस्यीय समिती गठीत करून ४ दिवसात अहवाल सादर केल्यानंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी देऊन सुद्धा ठोस कारवाई न केल्यामुळे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली, तात्काळ ठोस कारवाई द्वारे संदेश जाऊन महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे.

Back to top button