बीड (प्रतिनिधी): बहुजन समाजाचे नेते प्रा़ शिवराज बांगर यांना खोट्या एमपीडीय मध्ये तब्बल नव्वद दिवसा पासुन अटक केले आहे, अनेक वेळा सर्वच पक्ष संघटनांनी बीड जिल्हा अधीकारी व बीड जिल्ह्यातील सर्वच तहसिलदार यांना निवेदन दिले आहे, निवेदनात वार वार सांगीतले आहे की प्रा शिवराज बांगर यांच्या वरील एमपीडीय कार्यवाही राजकीय सुडबुद्धीने केली आहे, त्यांच्या वर कुठे ही गंभीर गुन्हे नाहीत, सामाजिक कार्य करत आसतांनी किरकोळ गुन्हे त्यांच्या वर दाखल आहेत, परंतु एका ही गुन्ह्यात त्यांना गुन्हेगार म्हणून निकाल दिला नाही, हे जिल्हा अधीकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन सांगीतले आहे, परंतु बीड जिल्हा अधीकारी यांच्या कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आज परत एकदा बीड जिल्हा अधीकारी कार्यालयासमोर प्रा,शिवराज बांगर युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष विवेक कुचेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत अधीक माहिती अशी की, बहुजन समाजाचे नेते प्रा शिवराज बांगर हे विस वर्षा पासुन बीड जिल्ह्यात सामाजीक व राजकीय जीवनात सक्रीय आहेत, ते दलित, पिडीत , उसतोड कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव संविधानीक लोकशाही मार्गाने लढा देत आहेत, परंतु राजकीय सुडबुद्धीने त्यांच्या वर एमपीडीय सारखी भयान कार्यवाही करून त्यांना 90 दिवसा पासुन औरंगाबाद हार्सुल जेल मध्ये स्थानबद्ध केले आहे, 90 दिवस उलटुन गेले तरी देखील त्यांची सुटका झाली नाही, त्यामुळे सर्व पक्षांच्या व सामाजीक संघटनांच्या वतीने 28 मार्च 2022 रोजी बीड जिल्हा अधीकारी कार्यालया समोर लोकशाही मार्गाने धरने आदोलंन केले आहे
या धरणे आंदोलनात प्रा शिवराज बांगर युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष विवेक कुचेकर,युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष विष्णु देवकते, एम आय एमचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड शफिक शेख,दलीत पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर,डिपाआयचे जिल्हाध्यकष सुनिल पाटोळे,ऑल ईडिंया पँथर सेनेचे नितीन सोनवणे , महेश कांबळे,प्रमोद निकाळजे,बापु आहीरे, आकाश निकाळजे, राहुल बांगर,प्रताप सांळुके,ऊसतोड कामगार संघटनेचे डॉ संजय तांदळे,मनोहर चाळक,यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.