सोयगाव,ता.८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
तीन दिवसापासून विश्रांती घेतलेला पावूस शुक्रवारी पुन्हा सोयगाव शिवारावर बरसला.सायंकाळी अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी कापूस वेचणी माजुरंही चांगलीच धांदल उडाली होती,वेचामी करून ठेवलेला कापूस पुन्हा भिजल्याने मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.परंतु वेचणीदरम्यान ओला झालेला कापूस शेतकऱ्यांना घराकडे घेच्वून जाण्यासाठी पावासाने कसरत करायला लावली.
सोयगाव तालुक्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसानंतर भिजलेला कापूस वेचणी करण्याच्या कामांनी वेग घेतला असतांना,तीन दिवसापासून शिवारभर कापूस वेचणी करण्याच्या कामांनी वेग घेतला परंतु अचानक सायंकाळी सोयगाव शिवारात झालेल्या वीस मिनिटाच्या पावसाने पुन्हा धांदल उडवून दिली होती.ऐन सायंकाळी बांधावर कापूस वेचणी करणाच्या आधीच पावसाने हजेरी लावली,त्यामुळे पुन्हा शेतकरी हवालदिल झाले आहे.
तालुक्यात सोयगाव वगळता तालुकाभर शुक्रवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पसरलेले पहावयास मिळाले होते,त्यामुक्ले सोयगाव शहर वगळता तालुक्यात कुठेही पावूस झालेला नव्हता.