बीड:आठवडा विशेष टीम―
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला
वरील म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष पहायला गेले तर डोईफोडे यांच्या पत्नी सारिका डोईफोडे या इट म्हणजे पिंपळनेर गणपतीच्या भागातील जिल्हा परिषद सदस्य त्यांनी त्यांचा विकासनिधि त्यांच्या मतदार संघात खचॅ करायला हवा.परंतु ज्यांनी पक्षाशी इमान राखलं नाही त्या मतदारांशी काय ईमान राखणारं
जयदत्त आण्णांना बोगस गुत्तेदारीमुळे भविष्यात किंमत मोजावी लागेल :- वानगावकर ग्रामस्थ
वानगाव मतदार संघाशी काहीही संबध नसताना केवळ डोईफोडे गुत्तेदाराला फायदा होण्यासाठी 10 लाखाच्या रस्ता कामाला दोन लाख रू.सुद्धा खचॅ केले नाहीत. तसेच घाठावरील आण्णाचे कायॅकतेे या गोष्टीमुळे नाराज झाले असून घाटावरील आण्णांचे कायॅकतेे काय मेले काय??? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येऊन जयदत्त आण्णांना बोगस गुत्तेदाराची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल ही भावना व्यक्त केली.
जिजाऊच्या पावनभुमित बोगस कामे होऊ देणार नाही, ग्रामस्थांची डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याकडे लेखी तक्रार―डाॅ.गणेश ढवळे
वानगाव येथिल ग्रामस्थांनी या बोगस रस्ता प्रकरणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर डाॅ.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यंत निकृष्ठ दजाॅचे काम असून त्याला एकदाही पाणी मारले नाही, दबई करण्यासाठी रोडरोलर सुद्धा वापरले नाही त्यामुळे 8 दिवसाच्या आतच रसत्याचे तिनतेरा वाजले आहेत.या प्रकरणी डाॅ.गणेश ढवळे व ग्रामस्थ यांनी या संदभाॅत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असून संबधितावर कठोर कारवाई करावी.बोगस टेंडर भरणाराचे नाव काळ्या यादित टाकावे. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग 211 वर डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.. जिजाऊच्या पावनभुमित कोणतीही बोगस कामे होऊ दिली जाणार नाहीत असे आश्वासन डाॅ.गणेश ढवळे यांनी वानगावकरांना दिले.
शासनाची 2 लाखाची फसवणुक ,18 टक्के बिलो टेंडर असताना आण्णांनी डोईफोडेला काम दिले― डाॅ.गणेश ढवळे
बीड तालुक्यातील वानगावफाटा येथिल राष्ट्रीय महामार्ग 211 ते गोगलवाडी रसत्याचे ओपन टेंडर निघाले होते.ते टेंडर 4 जणांनी भरले होते.त्यामधे जगदंबा मजुर सहकारी संस्था राक्षसभुवन ने 18 टक्के बिलो टेंडर असताना चुकीचे तांञिक कारण दाखवत ते रिजेक्ट करण्यात आले. जी संस्था 19 टक्के बिलो जात असेल त्या संस्थेला काम मिळाले नाही. तांत्रिक बाबीची अडचण करीत त्या संस्था अपाञ ठरविण्यात आल्या.त्यामुळे उघड उघड जिल्हा परिषद कमॅचा-यांनी शासनाला 2 लाख रूपयांना फसवले.संबधित कमॅचारी वगाॅकडून 2 लाख रू.नुकसान भरपाई शासनाने वसूल करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.. ते टेंडर 19 टक्क्यांनी बिलो दिले असते तर शासनाचा दोन लाख रूपयांचा फायदा झाला असता.
वानगावकरांचा नाही पण अभियंता चाटेचा फायदा झाला―डाॅ.गणेश ढवळे
वरील अंदाजे 10 लाख रू.किंमतीचा बोगस रस्ता गुत्तेदार डोईफोडे याने अभियंता चाटेशी आथिॅक व्यवहार करत रस्ता चांगला झाल्याचे सटीॅफिकीट सुद्धा दिले.यात ग्रामस्थांचे नुकसान तसेच शासनाची फसवणुक परंतु गुत्तेदार डोईफोडे आणि अभियंता चाटे यांची माञ चांदी झाली आहे..
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल ; कारवाई न झाल्यास रास्ता रोकोचा ईशारा वानगावकरांनी दिला आहे. :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
हा बोगस रस्ता 8 दिवसाच्या आत उखडला असून संबधित दोषींना गुत्तेदार डोईफोडे आणि अभियंता चाटे यांच्यावर कारवाई करण्यात येऊन संबधित संस्थेचे नाव काळ्या यादित टाकावे व शासनाची आथिॅक व वानगावकरांची शारीरीक आणि मानसिक छळवणूक केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर 8 दिवसाच्या आत कायवाई न केल्यास वानगावकरांनी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग 211 वानगाव येथे राजमाता जिजाऊच्या पुतळ्यासमोर स्थित मागाॅवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे लेखी निवेदन दिले आहे..
जयदत्त आण्णांना घाटावर कार्यकर्ता दुर्मीळ झाला― वानगावकर
ज्या अर्थी पिंपळनेर मतदार संघातील म्हणजेच घाटाखालिल कायॅकतेे यांना जर घाटावरील कामे दिली जात असतिल आणि त्यांना आथिॅक पाठबळ दिले जात असेल तर घाटावरील कायॅकतेे जयदत्त आण्णांना नकोसे झालेत का ?? अशी संभ्रमावस्था निमाॅण होऊन काहीनी त्यापेक्षा नवनिवाॅचित आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांच्यावर भरोसा ठेवून भविष्यात वाटचाल करायची अशी भुमिका वानगांवकरांनी घेतल्याचे दिसून येत आहे. तर याचवेळी निवडुन आलेल्या जिल्हापरिषद मतदार संघातील कायॅकतेे यांची फसवणुक झालीय अशी भावना जयदत्त आण्णांच्या कायॅकत्यांनी व्यक्त करत आण्णांना भविष्यात घाटावर कार्यकर्ते दुर्मिळ होऊ लागतील असा कयास बांधला आहे.