बीड: नानासाहेब ङिङूळ― सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटापालट झाली असून प्रत्येक पक्ष हा स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसापासून आपापसात चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आसून इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या डोंमरीतील मा.महेश भोंडवे यांनी थेट राज्यपाल साहेबांकडे मला काही दिवसासाठी मुख्यमंत्री करा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खूप मोठा बदल झाला आहे. सर्व पक्षाचे लक्ष्य आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जे ते नेते आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे व जनतेकडे कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही नेत्याचे लक्ष राहिले नाही. परंतु माननीय महोदय सध्या महाराष्ट्रात. विशेषत: मराठवाड्यात मान्सूनच खूप उशिरा आगमन झाल्यामुळे माझा सर्व शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच महाराष्ट्रातील धरून बेरोजगार वर्गाला २०१९ पासून कोणतीही स्पर्धा परीक्षेची जाहिरात निघाली नाही. आणि ज्या जाहिराती निघाल्या त्याच्या परीक्षा योग्य झाल्या नाहीत. जो तो पक्ष आणि जो ते नेते सत्ता स्थापन करण्याच्या नादात माझ्या शेतकरी बंधू कडे आणि बेरोजगार तरुणाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे भविष्यात माझ्या शेतकरी बंधू च्या आत्महत्या रोखण्यासाठी माननीय मेहरबान राज्यपाल साहेबांनी मला जोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कराव. अशी मागणी पाटोदा तालुक्यातील डोमरी गावच्या मा. महेश भोंडवे यांनी राज्यपाल साहेबांकडे मागणी केली आहे.