आंतरराष्ट्रीयब्रेकिंग न्युजलेख

चीनचे भारतीयांशी होणारं आर्थिक युद्ध…?

(इकोनॉमिक वॉर…मोबाईल अँप,इलेक्ट्रॉनिक उत्पादने)

भारत आणि चीन यांच्यातही आर्थिक आघाडीवर सुरू असलेल्या गतिरोधकामुळे केंद्र सरकारने मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची अपेक्षा केली जात आहे, जेणेकरुन चिनी उत्पादने आणि इतर सेवा यासाठी देशात अधिक कठीण परिस्थिती उद्भवू शकतात. गेल्या आठवड्यात लडाखमधील हिंसाचारानंतर व्यापाऱ्यांच्या समुदायासह नागरिकांनी चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या हिंसाचारात २० सैनिक ठार आणि ७० हून अधिक जखमी झाले.

भारत चीन सीमेवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात पुन्हा तेच जुने पण नव्याने वाद सुरू झाला की,चीनी वस्तू वापरू नका,चीनी अँप, इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रीकल वस्तू,चैनीच्या गोष्टी, सौंदर्य प्रसाधने अश्या अन्य अत्यावश्यक गोष्टी वापरण्यास थेट नकार दिला,काहींनी चीनच्या विरोधात पडसाद उमटले लोकांनी घरातील टीव्ही फोडले कुणी मोबाईल फोडले तर कुणी चीनला सेकंदाला कोटी रुपयांची उलाढाल करून देणारे tik tok अँप डिलिट केले व आम्ही देशभक्त कट्टर स्वदेशी असल्याचा आव सर्वत्र आणला,पण काही दिवस जातात तेव्हा सर्व परिस्थिती जैसे थे होती.

या सर्व प्रकारावर नजर टाकताना अनेक गोष्टी लक्षात येतात, की जेव्हा चीनसारख्या देशाने जीवनातील प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध करून तो जागतिक बाजारपेठेत जागतिक दाराच्या किमतीपेक्षा माफक दरात त्यांची उत्पादने बाजारपेठेत आणली, यामुळे सर्वांना एक पर्याय मिळाला की ज्या गोष्टीसाठी अमाप रक्कम मोजावी लागते आहे तीच गोष्ट जर अत्यल्प दारात मिळत असेल तर मग देशप्रेम, स्वदेशी या संज्ञा कुठेतरी खिदपद पडतात हे नेहमीच नागरिकांनी सिद्द केले आहे.

भारत देश स्वतंत्र होऊन काही दिवसांनंतर १९६६-६७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चीनला धडा शिकविला ज्याच्या जखमा अजूनही हिरव्या आहेत. इंदिरा गांधी सरकारने दिलेल्या रणनीतिक आणि सशस्त्र पावसाचा चीन विसरला नाही. सुमारे ५३ वर्षांपूर्वी भूतानचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चीनच्या निशाण्याखाली आल्या. तेव्हा चीनी सैनिक डोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. १९६६ मध्ये चीनने भूतानच्या बाजूने असल्याची कठोर टीका केली. पण भूतान हा अतिशय जवळचा आणि मैत्रीपूर्ण देश असल्याची भारताची वचनबद्धता आहे.

दि.१७ जून रोजी भारत चीनचा सीमावाद यामुळे हल्ला झाला व त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीनचे ४८ जवान मारले गेल्याच्या बातम्या सकाळी सकाळी व्हायरल झाला व नंतर सायंकाळी तीच बातमी ते जवान शहीद नाही तर जखमी झाले ह्या बातम्या सर्वत्र पसरल्या मग आज भारत स्वातंत्र्यच्या ७३ व्या वर्षांत पदार्पण करत असताना जर ,ज्या मीडियामुळे, माध्यमांनमुळे आज भारत स्थिर आहे,त्या भारत देशाला हीच मीडिया जर चुकीचा संदेश देत असेल तर ही या भारत देशाची शोकांतिका म्हणावे लागेल..!

१९६६-६७ ला भारत चीनमध्ये जे युद्ध झाले त्या धर्तीवर एक इंडियन आर्मी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तो चित्रपट जरी काल्पनिक असला तरी या चित्रपटात दाखवलेले चित्र आज भारतीयांशी मिळते जुळते आहे,कारण भविष्यात जेव्हा कधी भारत चीनचे युद्ध होईल त्यामध्ये कुणाची हार जित होणार नाही तर यासाठी प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था (आर्मी) स्ट्राँग असते पण जि आर्मी स्ट्राँग करण्यासाठी प्रत्येक देशातील गरीब जनता उपाशीपोटी राहते,ज्या पैशातून आपण अन्न खरेदी करतो त्याच पैशातून आपण युद्धाचे साहित्य दारुगोळा खरेदी करतो ही परिस्थिती आहे, राजकीय चौकटीतील काही बोटावर मोजण्याइतके लोक आपल्या भारत देशाची हाताळणी करत आहे,

यापुढे जर भारत चीन मध्ये युद्ध झाले तर ती हत्यार युद्धाने नाही तर इकॉनमिक वॉर ने होईल यामध्ये जन्मलेल्या बाळापासून मारणाऱ्या माणसांपर्यत चीनच्या उत्पादनाची गरज चीनने भारतीयांना लावलेली आहे यामुळे आपण एक सुई जरी खरेदी केली तर त्याचा सरळ फायदा थेट चीनला होईल याचे उदाहरण आज सर्वांच्या डोळ्यासमोर आहे,ते म्हणजे चिनी अँप टीक-टॉक हे ६७ एम.बी.चे हे व्हिडिओ एडिटिंग व पब्लिसिटी अँप आहे,आज भारतीय घरामध्ये ७ सदस्य असतील तर त्यांपैकी ४ सदस्य हे या tik tok ऑपच्या अधीन गेले आहेत व यांच्या दिवसातील २४ तासांपैकी ४-५ तास प्रत्येकजण या अँपसाठी देत आहे व वस्तुस्थिती आहे, यामागचे इकॉनॉमिक वॉर कसे आहे पहा,एक सेकंदाला एक भारतीयाने हे अँप इन्स्टॉल केले तर ६७ MB डेटा जातो, तर एक तासाला किती लोक आहे अँप घेत असतील त्याचा आलेख नाही,हे अँप वापरताना मोबाईलमध्ये सर्वात जास्त इंटरनेट डेटा व पॉवर वापरणारे हे अँप आहे,यामध्ये ३० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड होतो जर एका सेकंदाला १ कोट व्हिडिओ अपलोड झाले तर त्याचा थेट फायदा चीनच्या इकॉनॉमिला होतो हे आहे चीनच्या पोटातील भारतीयांसाठी इ-वॉर…

म्हणूनच येणाऱ्या व चालू काळात हे युद्ध सुरू आहे,त्यामुळे या युद्धात देश किती संकटात व आर्थिक संकटात जाईल तेव्हा या देशाचा प्रत्येक नागरिक यासाठी जबाबदार असेल हे डावलता येणार नाही.

―संक्षिप्त―
इंजि.दत्ता हुले (बीड)
मो.9960135634

One Comment

  1. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे पण या हुलेंची भाषा इतकी खराब कशी ? साधी सोपी वाक्यरचनाही याना जमत नाही ? व्याकरणाच्या चुकांचे तर बघायलाच नको ! कृपया स्वतःची मराठी भाषा सुधारा. तुमच्यामुळे इतरांचं मराठी बिघडेल , अस लिहू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button