सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आमखेडा येथील ग्राम पंचायतीची कोरम अभावी रद्द करण्यात आलेली सोमवारची (दि.२७) ग्रामसभा गुरुवारी (दि.३०) गोंधळात पार पडली.
सरपंच अनिता नाईक (महाले) यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत कार्यालयात गुरुवारी घेण्यात आलेल्या ग्राम सभेला पंचायत समितीच्या पंचायत विभागाचा एकही प्रतिनिधी हजर नव्हते त्यामूळे त्यामुळे ग्रामसेवक नागनाथ येन्नावार यांनी कामकाज पाहिले.
यावेळी ग्रामपंचायतीत संबंधित सरपंच ग्रामसेवक मनमानी धोरणातून कामकाज करत आहे.कोणालाही न जुमानता मनमानी सुरु असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करीत ग्रामसभेला गैर हजर राहणाऱ्या उपसरपंच आणि सदस्य यांच्यावर कारवाई करण्यासह विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणीचा ठराव ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच टंचाई परिस्थितीत पिण्याच्या शुद्ध पाण्याचे नियोजन,रोहयोची कामे,शौचालये,दिवाबत्ती,रस्ते, अतिक्रमण,स्मशानभूमी दुरुस्ती,आदी कामे युद्ध स्तरावर करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.
यावेळी एकमेव ग्राम पंचायत सदस्य देवेंद्र तेलन्ग्रे, निलेश गाडेकर, विनोद जमधडे, दत्तात्रय ढगे, दिलीप निकम्, दिलीप सुरडकर, देवेंद्र मांडोळे, भरत पगारे, संदीप इंगळे, लक्ष्मण खलसे,वाकेकर, मिलिंद पगारे, गवनाजी नरवडे, संतोष घुघरे, कृष्णा शिंदें, मगनदास बैरागी आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
0