बीड:- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या अत्यंत धोकादायक असुन ४६८ शाळांमधील ८५६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असुन ग्रामीण भागातील ७७२ शाळांना वीजपुरवठा नाही तर थकीत वीज बिलामुळे ६२० शाळांमधील वीजपुरवठा खंडित केला असुन विद्यार्थ्यांचे संगणक,ई लर्निग,वीज उपकरणे बंद असल्याने डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असुन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , शेख युनुस च-हाटकर,शेख मुबीन यांनी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री ,शालेय शिक्षणमंत्री, पालकमंत्री बीड यांना केली आहे.
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७४ शाळा असुन यात २४१५ शाळा प्राथमिक तर ५९ शाळा माध्यमिक आहेत.जिल्ह्यात ११ तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या धोकादायक असुन मोठा पाऊस अथवा वादळवारे आल्यास धोका निर्माण होऊ शकतो.जिल्हा परीषदेच्या शाळांच्या ईमारतीची दुरावस्था असुन कुठे भिंती कुजलेल्या अवस्थेत तर कुठे छत उघडे पडलेले तर कुठे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शाळा, वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने शालेय मुलांची अडचण होत असुन दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण?? लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळे तातडीने धोकादायक शाळांच्या दुरूस्तीसाठी निधी देण्यात येऊन तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील तालुका निहाय मोडकळीस आलेल्या शाळा खालिल प्रमाणे आहेत.
आष्टी तालुका ८० शाळांमधील ११९ वर्गखोल्या, अंबेजोगाई तालुक्यातील १६ शाळांमधील ३० वर्गखोल्या, बीड तालुक्यातील २८ शाळांमधील ३७ वर्गखोल्या,धारूर तालुक्यातील १७ शाळांमधील ३० वर्गखोल्या,केज तालुक्यातील १९ शाळांमधील २२ वर्गखोल्या, गेवराई तालुक्यातील ६२ शाळांमधील १२५ वर्गखोल्या, माजलगाव तालुक्यातील १३ शाळांमधील २६ वर्गखोल्या, परळी तालुक्यातील ४६ शाळांमधील ८८ वर्गखोल्या, पाटोदा तालुक्यातील ३१ शाळांमधील ४० वर्गखोल्या, शिरूर तालुक्यातील २४ शाळांमधील ३२ वर्गखोल्या, वडवणी तालुक्यातील १३ शाळांमधील ४३ वर्गखोल्या एकुण ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असुन त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे.
वायकर वस्ती येथे छत पडलेल्या वर्गात ज्ञानार्जन
बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळवाडी केंद्र अंतर्गत वायकर वस्ती येथील शाळेच्या एका वर्गाचे छत पुर्णपणे कोसळले असुन सध्या ज्या वर्गात मुलं ज्ञानार्जन करत आहेत त्या वर्गातील छत पडण्याच्या अवस्थेत असुन मुलांच्या जिवीताला धोका असुन शेतकरी ऊसतोड मजुरांच्या लेकरांनी पावसाळ्यात शाळा उघड्यावर कशी शिकायची असा संतप्त सवाल पालक दादु पवार,सुशीला बहिरवाळ, अमोल बहिरवाळ यांनी केला आहे.
शाळांमधील वीजबील थकीत असल्याने ४९७ शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित असुन तातडीने वीज पुरवठा करण्यात यावा
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ७७२ शाळांना वीजपुरवठाच नाही तर जिल्ह्यातील ४९७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे १ कोटी ३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन कट करण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे संगणक,ई लर्निग,एल ई डी टीव्ही, डिजिटल बोर्ड तसेच वीजेची उपकरणे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच
बहुतेक शाळात अंधार आहे.अनेक शाळांच्या मागील भागात गवत आणि झाडेझुडपे असतात त्यातुन कधी विंचु तर कधी सापही शाळेत येतात. अंधार असल्याने अनेकदा दिसत नाहीत.वीज असेल तर अशा प्रकारचा धोका होणार नाही.शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.