औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: वृक्ष रोपणाचा पहिला टप्पा,वेताळवाडीच्या किल्ल्यावर श्रमदान

सोयगाव दि.१०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात शहराजवळील ऐतिहासिक वेताळवाडी किल्ल्यावर तब्बल पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प महसूल आणि वनविभागाच्या वतीने करण्यात आला असून या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला प्रराम्भाही करण्यात आल आहे.यासाठी श्रमदानासाठी तब्बल शासकीय कर्मचाऱ्यांसह तीनशे जणांचा चमू वेताळवाडी जंगलाच्या भ्रमंतीवर गेला असून खड्डे खोदण्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला.
३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात वेताळवाडी किल्ला आणि वेताळवाडी जंगल या भागात तब्बल पाच हजार वृक्षांचा लागवडीचा संकल्प करण्यात आला असून या योजनेतून ऐतिहासिक किल्याला पुन्हा हरियाली प्राप्त होणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.दरम्यान पाच हजार झाडांची लागवड करून ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेचा तालुकाभर शुभारंभ करण्यात येईल असेही प्रवीण पांडे यांनी सांगितले,वेताळवाडीच्या किल्ल्यावर शासकीय कामांची वेळ वगळता वनविभाग,महसूल कर्मचाऱ्यांनी श्रमदान सुरु केले असून लोकसहभागचा हातभार या कामाला मिळाल्याने सुणारे तीनशे जणांच्या चमूने वेताळवाडी किल्ल्यावर खड्डे खोडले आहे.वृक्ष लागवड योजनेत वेताळवाडीच्या किल्यावर शासकीय कर्मचारी,ग्रीन आर्मीचे कार्यकर्ते आदींनी वेताळवाडीच्या किल्ला परिसरात गवत,पाला पाचोळा,प्लास्टिक आदि जमा करून तीनशे खड्डे खोदले,त्याच प्रमाणे वेताळवाडी धरणावरील गवत काढून सुमारे दोन एकर परिसर स्वच्छ केला असून या परिसराला आता वृक्ष लागवडीचे वेध लागले असून वेताळवाडी जंगल आणि किल्ला परिसरात चिंच,सीताफळ,करंज,पिंपळ,बिबा,धामोडी,निंब,पळस,मोह,आदि वृक्ष लागवडीने या परिसराला झाडांचे वैभव प्राप्त करण्याचा संकल्प यंदाच्या वृक्ष लागवड योजनेपासून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button