सामाजिक वनीकरण कडून फक्त कागद पत्री वृक्षारोपण
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पळासखेडा ता सोयगाव या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग कडून 2018-19 या कालावधीत मोट्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती मात्र ही वृक्ष ची लागवड ही योग्य रित्या न करता आपण घेतलेले काम फक्त पूर्ण करण्याच्या उद्देशाने ठेकेदार किंवा सामाजिक वनीकरण कडून करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी लागवड करण्यात आले रोप ही जगली नाही या विषयी सोयगाव येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात पळासखेडा येथील ग्रामस्थांनी या विषयी विचारणा केली असता त्यांना देखील समाधान कारक उत्तर अधिकाऱ्यानं कडून देण्यात आली नाही.
एकीकडे आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे यांचे प्रमूख कारण आहे वृक्ष ची होत असलेली तोड व ही तोड थांबून नवीन वृक्षारोपण करण्या करता शासन मोट्या प्रमाणात प्रयत्न करत आहे शिवाय सामाजिक संघटना, नागरिक देखील वृक्ष लागवड प्रोत्साहन देत आहे .
परतू शासनाने वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या निधी योग्य वापर होत नसल्या ने लागवड केलेल्या रोप ही जगत ही नाही वाढत ही नाही जंगले ओस होत आहे मात्र ठेकेदार चे खिसे भरत आहे , या मुळे पर्यावरण मोठे नुकसान होत आहे सोयगाव तालुका हा आज अजिंठा लेणी च्या रूपाने संपूर्ण देशात परिचित आहे विदेशी पर्यटन देखील रोज भेट देतात त्यामुळे त्याच्या मार्फत नैसगिर्क पर्यटन स्थळ ची कशी माहिती जगात पोहचत असेल हा एक विचारांचा भाग आहे या संपुर्ण विषयांवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी नि लक्ष द्यावे व या कामाची चोकशी करून दोषी विरुद्ध योग्य ती कार्यवाही करावि अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनी, मनोज जैन यांनी केली आहे