नागपूर:आठवडा विशेष टीम― सेना ,काँग्रेस राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेले नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दरम्यान, जरी स्वा. शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोडली तरी आम्ही भाजपकडे लगेच जाणार असं होऊ शकत नाही. भाजपाने जर चांगले काम केलं असत तर त्यांच्यापासून दूर झालोच नसतो अस राजू शेट्टी म्हणाले.
काय आहेत राजू शेट्टी यांच्या नाराजीचे मुद्दे ?
केंद्र सरकारने भूसंपादनाच्या 5 पट मोबदल्याचा कायदा 2 पटीवर आणला. कर्जमाफी पिकविमा, दिवसा वीज हे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा काढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. तसंच ऊस उत्पादकांच्या एफ-आर-पीचेही राज्य सरकारने तुकडे केले असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मत आहे.