सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―खरीप हंगाम पीकविमा भरतांना झालेल्या चुका व त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा मुदतीनंतर सात दिवसांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी नुध्वरी आयोजित बैठकीत दिली आहे.दरम्यान सी.एस.सी केंद्रसंचालकांनी पीकविमा भरण्याचे काम बिनचूक करावे,विमा उतरवितांना शेताकार्त्यांचे समाधान करूनच काम करावे,विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आढळल्यास तातडीने संबंधित केंद्राचा परवाना निलंबित करण्यात येईल, अशा सूचना बँक प्रतिनिधी आणि सी.एस.सी केंद्र संचालकांना तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिल्या आहे.
शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पीकविमा मार्गदर्शन बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती,यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले,सी.एस.सी चे जिल्हा समन्वयक गणेश मोरे,आपले सर्काये केंद्राचे निलेश शेजवळ,जिल्हा बँकेचे सतीश कोलते,तालुका समन्वयक सुनील काळे आदींची उपस्थिती होती,यावेळी तालुक्यातील कृषी सहायक,सी.एस.सी केंद्र संचालक आदींनी समस्या उपस्थित केल्या.आभार दीपक बिऱ्हारे यांनी मानले.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा विमा भरण्यास बँकांचा नकार-
सी.एस.सी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होवू नये यासाठी बँकांनाही विमा स्वीकारण्याच्या सूचना असतांना तालुक्यातील जीलः बँका आणि राष्ट्रीयकृत बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा विमा भरण्यास नकार देत असल्याचं तक्रारी वाढत्या झाल्याने तहसीलदार प्रवीण पांडे यांनी बँकांना विमा स्वीकारण्यास सूचना दिल्या आहे.