बातम्या
CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड CBSE Private Candidate Form 2027 Class 12 & 10: Check Date, Fees, Eligibility & How to Apply FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

बीड: दिवाळी उलटूनही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; ‘नियोजनशून्यतेमुळे बळीराजाची तीव्र नाराजी’ – दत्ता वाकसे

बीड, ०२ नोव्हेंबर (विशेष प्रतिनिधी):

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, बीड जिल्ह्यासह अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पूर्ण अनुदान जमा झालेले नाही. शासकीय मदतीच्या नियोजनातील गोंधळामुळे आणि तुटपुंज्या रकमेमुळे बळीराजाची दिवाळी अंधारात गेली आहे. या दिरंगाईवर मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकार मदत कधी देणार, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

नैसर्गिक आपत्तीचा दुहेरी फटका

२०२५ च्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी, ढग सदृश्य पाऊस यासह हुमणी अळी आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाने नदी-नाल्यांच्या काठची पिके पूर्णपणे उध्वस्त केली.

शासकीय मदतीची घोषणा आणि अंमलबजावणीतील त्रुटी

शासनाने नुकसान भरपाईची मर्यादा प्रति दोन हेक्टरसाठी १८,५०० रुपये ठेवत, ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे जाहीर केले होते. तथापि, अनेक शेतकऱ्यांना १८,५०० रुपयांऐवजी ८,५०० रुपयांपेक्षाही कमी तुटपुंजी मदत मिळाली आहे. इतकेच नव्हे, तर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. सरकारची मदत आज-उद्या मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी गेली असून, यामुळे सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

“दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा केले जाईल, असे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, भाजीपाला आणि फळबाग उत्पादक शेतकरीही मदतीपासून वंचित आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी या फसव्या महायुतीला धडा शिकवतील,” असे मत शेतकरीपुत्र दत्ता वाकसे यांनी व्यक्त केले.

अवकाळी पावसामुळे संकट अधिक गडद

अतिवृष्टीचे संकट डोक्यावर असतानाच, आता खरीप हंगामातील पिके काढणीला आली असताना आणि काही शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी झाली असताना परतीच्या अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळीमुळे नैसर्गिक संकटाची छाया अधिक गडद झाली आहे.

  • अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस (पांढरे सोने) वेचणीला आलेला असताना नुकसान होत आहे.
  • वेचून ठेवलेले सोयाबीन काढणीसाठी शेतात पडलेले असताना पाऊस आल्याने ते सडू शकते.

निसर्ग आणि शासनाची अनास्था अशा दुहेरी पेचात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता करावे तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. मल्हार ब्रिगेडचे अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी कृषिमंत्र्यांना थेट विचारणा केली आहे की, “एकीकडे निसर्ग कोपला आहे आणि दुसरीकडे सरकार मदत करायला तयार नाही, मग ही मदत मिळेल तरी कधी?”

तलाठी आणि प्रशासकीय स्तरावर घोळ

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी तात्काळ याद्या बनवून अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, स्थानिक स्तरावर तलाठी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये घोळ झाल्याने ते मदतीपासून वंचित राहिले आहेत. या प्रशासकीय त्रुटींमुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही, ज्यामुळे असंतोष वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *