अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

बीड: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल अंबाजोगाईत आनंदोत्सव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होवून मुख्यमंत्रीपदी उद्धवजी ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सहा नेत्यांनी गुरूवार,दि.28 नोव्हेंबर रोजी मुंबईत शिवतीर्थावर शपथ घेतली.हा शपथविधी सोहळा नयनरम्य व दिमाखदार होता. प्रचंड संख्येने लोक शिवतीर्थावर जमा झाले होते.शपथविधी होवून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील सावरकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक येथे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औंदुबर मोरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक बबनराव लोमटे,नगरसेवक मनोज लखेरा,बीड जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर सोमवंशी, अॅड.घोगरे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,
नगरसेवक धम्मा सरवदे,
नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,
राणा चव्हाण,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर,माजी नगरसेवक खालेद चाऊस,
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख मुनवरभाई, कचरूलाल सारडा,दिनेश घोडके,शेख खलील,प्रमोद गवळे,सुगत सरवदे,खंडेराव टेमकर,सचिन जाधव,शेख खलील,विकास देशमुख,शेख जावेद,भारजकर,पसारकर, सुशील जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील सावरकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

महाविकास आघाडीचे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार-राजकिशोर मोदी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा खा.सोनियाजी गांधी,माजी अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांचे मार्गदर्शनाखाली व
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबजी थोरात,माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, आ.अमितजी देशमुख, आ.धिरजजी देशमुख यांच्या सहभागाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचा सहभाग सदरील सरकार मध्ये आहे.जनतेच्या हिताचे हे सरकार असेल बीड जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजुर यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे सरकार कटीबद्ध ठरणार आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.या शेतकर्‍यांना भरीव मदत देवून सहकार्य करण्याचे काम हे सरकार करेल. समाजातील बेरोजगार युवक, युवती यांना रोजगार उपलब्ध होईल.विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील.बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व मराठवाड्यात वॉटरग्रीड द्वारे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी हे सरकार काम करेल असा विश्‍वास वाटतो.आगामी काळात हे सरकार जनतेची स्वप्ने व विकासाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करेल यात तिळमात्र ही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button