पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटोदा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा नदीच्या काटा वरिल विहिरी जवळ व कृषी उत्पन्न बाजार समिती समिती,वंसतराव शाळा,धोंडे कॉलेज,माऊली नगर, घोलपवस्ती कडे पाऊसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याने व शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या विहिरी जवळ बंधारा केल्याने शहराचे पाणी संकट कमी होणार व त्यावर पुल केल्याने पाऊसाळ्यात त्या भागातील लोकांना जाता येईल म्हणून पाटोदा शहरातील मांजरा नदीवर कोल्हापूर सारखे बांधारे बांधण्यात यावा आशी मागणी अनेक वर्षापासून पाटोदेकर करीत होते या मागणीला यश आले असुन पाटोदा नगरपंचायतच्या विकासभु नगर उपाध्यक्षा पुञ सय्यद शहानवाज यांनी दमदार आमदार सुरेश धस यांच्या जवळ या गंभीर विषयावर वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आमदार सुरेश धस यांनी मंत्रालयातून छञपती शाहु महाराज यांच्या कल्पनेतील कोल्हापूरच्या धर्तीवर पाटोद्याच्या मांजरा नदीवर बंधारा प्लस पुलास कोट्यावधी रुपय मंजूर करुन आणून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असुन बंधार्याचे काम प्रगतीपथावर चालू आसलेतरी आताच मांजरा नदीच्या खोर्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात साचला आहे तसेच साबिर कंट्रक्शन द्वारे अत्याधुनिक मशनरीने प्रथमच पाटोदा शहरात बंधार्याचे कामचालू असल्यामुळे लोक काम पाहण्यासाठी गर्दी करत असुन सय्यद शाहानवाज यांच्या उत्कृष्ट कामाचे कवतूक करत असुन आजून पाटोदा शहरातील मांजरा नंदीच्या हार्दीत आशेच एक दोन बंधारे झाले पाहिजे अशी मागणी जनतेतून होत आहे.
0