मुंबई दि. 23. राज्यात दि. 1 ते 22 जुलैपर्यंत 871 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 21 लाख 39 हजार 848 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 21 लाख 39 हजार 848 असे दि. 1 एप्रिल ते दि . 22 जुलै या कालावधीत एकूण 1 कोटी 11 लाख 19 हजार 377 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.