महाराष्ट्र राज्यराजकारण

स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारकडून– जयंत पाटील

प्रतिनिधी दि.०१: दोन कोटी रोजगारांचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारनेच केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाच वर्षांत देशात असहिष्णुता, जातीय तणावाच्या वातावरणामुळे गुंतवणूकीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचेही पाटील म्हणाले. राम मंदिरासारख्या विषयाचे हे सरकार भांडवल करू पाहाते आहे, पण देशातील प्रत्येक माणसाला रोजगाराची चिंता अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या कथनी आणि करनीतले अंतर जनतेला समजले आहे. त्यामुळे आता जनता परिवर्तनासाठी निवडणुकीची वाट बघते आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यानंतर तरुणांची सर्वात मोठी फसवणूक मोदी सरकारकडून – Jayant Patil – जयंत पाटील जयंत पाटील दोन कोटी रोजगारांचे…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, 1 February 2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button