पाटोदा:आठवडा विशेष टीम―स्वातंत्रसेनानी , सनदी अधिकारी , घरोघरी नोकरदार ,उच्चपदस्थ राजकारणी अशी प्रसिद्धी मिळालेल्या पाटोदा तालुक्यातील मौजे थेरला गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोअरवेल धारकांच्या मनधरण्या कराव्या लागतात, बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पं.स.कडे पाठवल्यचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे उपसरपंच गणेश राख यांनी सांगितले.
विठ्ठल राख :
गावामध्ये एक पाण्याची टाकी आहे परंतु तेवढ्याने भागत नसल्याने ३ कि.मी.अंतरावरील रोहतवाडी तलावावरुन गावात सिमेंट निर्मित टाकीमध्ये पाणी सोडण्यात येते.त्याटाकीतून ग्रामस्थ पाणी शेंदुन आपापल्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये पाणी साठवून आवश्यकतेनुसार नेण्यात येते.सकाळी मात्र याठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जत्रा भरते. सांडपाण्याची जरी चिंता मिटली तरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, खाजगी बोअरवेल मालकांची मनधरणी करुन मिळवावे लागते.
गणेश राख ( उपसरपंच ,थेरला (ता.पाटोदा):
दररोज रोहतवाडी तलावावरुन गावातील टाकीत पाणी सोडण्यात येत आहे , परंतु उन्हाळ्याचा भविष्यात विचार करता नागरी वस्ती आणि तलावाच्या खाली बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केला आहे. आणि जिल्हा प्रशासनाकडे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश:
बीड जिल्हयात सर्वांत जास्त स्वातंत्र सैनिक , सनदी अधिकारी , नोकरदार, राजकिय पुढारी असलेल्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्प नसावा ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सकाळी पाण्याच्या टाकितून पाणी शेंददाना शारीरिक अंतर राखणेच अवघड आहे. शासनाने लवकरात लवकर जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. या पाणीटंचाई संदर्भांत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री , ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.
थेरला येथील पाण्याची समस्या