अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजहेल्थ

लॉकडाऊन काळात ही डॉ राहूल धाकडे यांची अविरत रूग्णसेवा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रांत सतत अग्रेसर असणारे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉ.राहूल धाकडे यांनी कोरोना या जिवघेण्या संकटात व लॉकडाऊन काळात दररोज आपला दवाखाना सुरू ठेवला.रूग्णांना तत्पर व आपुलकीने आरोग्य सेवा दिली.त्याबद्दल रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी धन्यवाद देवून डॉ.राहुल धाकडे यांचे आभार मानले.

लॉकडाऊन कालावधीत डॉ.राहूल धाकडे यांनी मोबाईल,मेसेजद्वारे नियमीत रुग्णाला वैद्यकिय सल्ला देवून शहरात हजारो रुग्णांची सेवा केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.कोरोना हे जिवघेणे संकट आल्यापासून साथजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून अनेक नामांकित डॉक्टर बांधवांनी आपले दवाखाने बंद ठेवणेच पसंत केले. पुणे,मुंबई,औरंगाबाद, लातूर अशा शहरात चांगले डॉक्टर घरात बसले.मात्र ज्यांच्या अंगी सामाजिक संवेदना आणि आरोग्य सेवा भिणलेली आहे.अशांनी माञ आपला जिव धोक्यात घातला.पण,रूग्णसेवा केली.त्यापैकीच डॉ.राहूल धाकडे हे एक आहेत. संकटकाळात एक ही दिवस त्यांनी दवाखाना बंद ठेवला नाही.रोज ओपीडी सुरू ठेवली.असंख्य रुग्णांवर उपचार केले.खरे तर संकट सर्वांना सारखेच.पण, धन्वंतरीचे दूत म्हणून अशावेळी लोकांना तपासणे,आरोग्य सेवा देणे हा कर्तव्याचा भाग समजून डॉ.राहुल धाकडे हे काम करीत आहेत.डॉ.राहूल धाकडे हे सर्वपरिचित असून गावचे भुमीपूत्र आहेत.अतिशय कष्टातून, आई-वडिलांच्या पुण्याईने पुढे आले.सर्व परस्थितीची जाणिव असल्याने या संकटात त्यांनी आपला दवाखाना सुरू ठेवून रुग्ण सेवा केली.सोशल डिस्टन्स पाळून व मास्क बांधून, सॅनिटायझर वापरून दररोज बहुतांश रुग्णांची तपासणी केली.मागील 10 वर्षांपासुन वैद्यकीय क्षेत्रात ते ह्रदयरोग,छातीविकार तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.आशा आयसीयुचे ते संचालक आहेत.कोरोना संकट व लॉकडाऊन काळात त्यांनी अतिदक्षता तज्ञ म्हणून संपुर्ण जबाबदारी सांभाळली.अंबाजोगाई शहरात ते माता रमाई महोत्सव,आशा आयसीयुच्या वर्धापन दिनी प्रबोधनपर उपक्रम राबवितात.साहित्य,नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राशी ते निगडीत आहेत.त्यांच्या योगदानाचे सर्वञ कौतूक होत आहे.त्यामुळे डॉ.धाकडे हे देवदुताची भुमीका बजावत असल्याचे उमेश जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते विशाल जगताप आणि प्रवीण पोटभरे यांचेसह अनेकांनी स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितल्याचे दिसून येते.

*रूग्णसेवा आमचे कर्तव्य..!*

रूग्णांची सेवा हे तर आमचे कर्तव्यच आहे.तसेच रूग्ण हा आमच्यासाठी ईश्वर ही आहे.कोरोना या संकटामुळे लोक घाबरले आहेत.मग,अशावेळी आम्ही नाही.तर कोण येणार मदतीला.? आमच्या कुटुंबात बहिण आणि पत्नी या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत त्यांनी या काळात अनेक गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली.मी देखील अनेकांचे तत्पर निदान केले.योग्य औषधोपचार केले.तर काहींचे ह्रदयविकार दुर करून त्यांचे प्राण वाचविता आले याचे समाधान आहे. *――डॉ.राहुल धाकडे,अंबाजोगाई.*

Back to top button