महाराष्ट्र राज्यराजकारण

सर्वव्यापी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष

मुंबई दि.०१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शुक्रवार, दि. ०१ फेब्रुवारी रोजी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार, मध्यवर्गीय अशा सर्व समाज घटकांना दिलासा देणारा आहे. हा अर्थसंकल्प ‘नवा भारत’ निर्माण करण्यासाठी सर्व वंचित, बहुजन, आर्थिक मागसलेल्या समाजाला शक्ती देणारा आहे. या अर्थसंकल्पावर सर्व स्तरातील जनता खूष आहे, त्यामुळेच काँग्रेस नाखूष आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पाच्या जल्लोष कार्यक्रमात व्यक्त केली. लोकाभिमुख अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केला त्यानिमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

हा अर्थसंकल्प २०१९ पुरता मर्यादीत नसून २०३० मधील नव्या भारताला घडवण्यासाठी कटीबध्द असलेलला अर्थसंकल्प आहे. सर्व देशभर आनंदाचे वातावरण आहे. देशातील सर्व स्तरातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे, असेही शेलार म्हणाले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतील प्रतोद आमदार राज पुरोहित, नगरसेवक अतुल शहा, नगरसेवक आकाश पुरोहित, भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ, संतोष पटेल हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून फटाक्यांची आतषबाजी केली.


नरेंद्र मोदी सरकारच्या २०१९च्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे आणि विशेष तरतुदी:-

▪दोन हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी थेट (६००० ₹)जमा होणार.१ डिसेंबर २०१८ पासूनच योजना लागू तर ३ हप्त्यात ही रक्कम जमा होणार

▪ पशुसंवर्धन, मत्सपालनासाठी शेतकरी क्रेडिट कार्ड, कर्जामध्ये २% सूट देण्यात येणार

▪ ग्रॅच्युईटीची मर्यादा १० लाखांहून २० लाखांवर, १० कोटी असंघटित कामगारांसाठी केंद्राची श्रमयोगी पेन्शन योजनेसाठी तरतुद

▪ असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, ६० वर्षे पार कामगारांना ३ हजार रुपये पेन्शन

▪ गर्भवती महिलांसाठी २६ आठवड्यांच्या म्हणजेच १८२ पगारी रजांची तरतूद

▪ देशाच्या सरंक्षण खात्याला उत्तम व आधुनिकतेने विकसित तंत्रज्ञानासाठी ३ लाख कोटींचा निधी

▪ जोखीम असलेल्या पदांसाठी भत्त्यात वाढ, वन रँक, वन पेन्शन योजना लागू

▪ दररोज देशात २७ किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती

▪ मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवर मिळण्यासाठी आराखडा तयार

▪ येत्या ५ वर्षात १ लाख डिजिटल गावांची निर्मिती होणार

▪ ५ वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली, १०० हुन अधिक विमानतळ कार्यरत झाली आणि आणखी विमानतळ येणाऱ्या काळात बांधण्यासाठी आर्थिक तरतूद जाहीर

▪ रेल्वे खात्यासाठी ६४ हजार कोटींची तरतूद, वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात

▪ लघुउद्योगांना १ कोटी पर्यंत कर्ज फक्त ६ टक्क्यांवर ( योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर )

▪मध्यमवर्गीय करदात्यांना ५ लाखांपर्यंत कर नाही,योग्य निवेश असेल तर ६.५ लाखापर्यंत सवलत

▪ उज्वला योजने अंतर्गत ६ कोटी गैस कनेक्शन्स मोफत देण्यात आलेत आणखी तरतूद होणार

▪राष्ट्रीय कामधेनू उद्योगाला ७५० कोटींचा निधी – ( गौ संवर्धन आणि दुग्धविकास )

▪सर्वांना अन्न ह्या संकल्पनेसाठी १.७ लाख कोटींची तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button