ऊसतोड कामगारकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युज

होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा कीट वाटणार की ग्रामपंचायतची भरती करणार ? ऊसतोड मजुरांचा सवाल ! – डॉ ढवळे

पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची संघटीत गुन्हेगारी मोडीत काढा

जिल्हाधिकारी यांचा वचक राहीला नाही, १४ दिवस झाले सरपंच, ग्रामसेवक फिरकलेच नाहीत ―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.०७:आठवडा विशेष टीमबीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल साखर कारखान्यावरून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करुन देणे सोडाच आज दि.७/०५/२०२० रोजी वार गुरुवार दुपारी १२ वाजेपर्यंत कुणीही भेटायला आले नाहीत, आठवड्यापूर्वी पालकमंत्री मुंडे यांनी घोषणा केलेले मोफत कीराणा कीट ८ दिवस झाले तरी आमच्यापर्यंत पोहोचले नाही ,होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा किट वाटणार आहात कि ग्रांमपंचायतची भरती करणार असा संतप्त सवाल ऊसतोड मजुरांनी केला आहे.

विशाल काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

मो.नं.९३५९२१११८६

आम्ही जवाहर कारखान्यावरुन येऊन १४ दिवस झाले, सरपंच, ग्रामसेवक भेटलेच नाहीत, ग्रां.पं.शिपाई बापु थोरात यांनी सांगितले सरपंचांनी गावठाणा बाहेर रहायचे सांगितले आहे. आज १४ दिवस झाले आम्हाला सरपंच, ग्रामसेवक भेटायला आलेच नाहीत. तलाठी दोन वेळेस आले पण इथं लाईट, पिण्याचे पाणी काहीच सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही म्हणाले तुमचं तुम्ही बघा.

सविता काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

आम्हाला पिण्याच्या पाण्याची, लाईटची कसलीही सोय केली नाही, १४ दिवस झाले २ कीलोमीटर डोंगरातुन तलावाखालच्या झ-यातुन पाणी आणावे लागते ,ऊन्हातान्हात लहान लेकरांचे हाल होत आहेत, १४ दिवसात धान्य दिले नाही, लाईटची सोय नसल्याने विंचू काट्याची भिती वाटते. पालकमंत्री मुंडे साहेबांनी मोफत किराणा किट देऊ म्हणलेले आठवड उलटुन गेला.अजुन काहीच दिले नाही. आम्हाला आमच्या गावातील घरी जाण्याची परवानगी द्यावी.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश

पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट देण्याची घोषणा होऊन आज ८ दिवस झाले, दि.५ तारखेला अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी आदेश ५ तारखेला दिले आहेत. परंतु सरपंच, ग्रामसेवक, आणि तलाठी हे त्यांच्या संघटनेच्या जोरावर संघटीत गुन्हेगारी करत आहेत ती पालकमंत्र्यांनी मोडीत काढावी.
दि. २३/०४/२०२० रोजी जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी ग्रामसेवक, तलाठी यांनी मुख्यालयी रहावे अन्यथा राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा कनिष्ठ स्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांना धाक राहीला नाही त्यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केली जाते.त्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.आणि २ दिवसांच्या आत मोफत किराणा किट वाटप करण्यात यावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य , कार्यकारीणी आधिकारी , जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अन्नपुरवठा व पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button