ज्ञानेश्वर धोंडू पाटील―संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक सुधारणा: मतपत्रिका की ईव्हीएम मशीनद्वारे केले जाणारे मतदान या ज्वलंत विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर याविषयावर चर्चा सुरू असून निवडणूक आयोगाकडे या संदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल तक्रारी आल्या आहे. सुप्रीम कोर्टातही या संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या.
आशा महत्त्वपूर्ण विषयावर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची परिसंवादात व्याख्याने होतील. अशी माहिती या परिसंवादाचे संयोजक प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे यांनी पत्रकारांना दिली.
परिसंवादाचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री रंगनाथ काळे हे राहणार असून बीजभाषन विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ प्रशांत अमृतकर हे करतील तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार, विचावंत जयदेव डोळे, लेखक प्रा बी वाय कुलकर्णी, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ नवनाथ आघाव, राज्यशास्त्ताचे अभ्यासक लेखक डॉ पंडित नलावडे हे भाष्य करणार आहे. या प्रसंगी उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी श्री ब्रिजेश पाटील आणि सोयगावचे तहसीलदार श्री प्रवीण पांडे हे ही प्रमुख पाहुणे म्हणून चर्चेत सहभाग घेणार आहे. मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता कार्यक्रम होईल. परिसंवादाचे समन्वयक डॉ राजू वानारसे सहसंयोजक प्रा श्रीकृष्ण परिहार व त्यांचे सहकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.